जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक राज्यांमध्ये कहर केला आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या 40 दिवसात 187 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 34 लोक बेपत्ता आहेत. तेलंगणामध्ये एका आठवड्यात 18 जणांचा मृत्यू झाला. सुमारे 12,000 लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. दुसरीकडे, उत्तराखंडमधील चमोली येथे रविवारी, 30 जुलै रोजी पहाटे डोंगरावरून दरड कोसळल्याने बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करावा लागला. जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिह्यातील एका गावात शनिवारी ढगफुटी झाल्यामुळे सात घरे, एक मशीद आणि दोन शाळांचे नुकसान झाले.