प्रतिनिधी /बेळगाव
आज जागतिक दृष्टिदिन असून ‘आपल्या डोळय़ांवर प्रेम करा’ हे या दिनाचे घोषवाक्मय आहे. डोळय़ांवर प्रेम असेल तरच आपण त्याची काळजी घेऊ शकतो. ही नवलाईची दुनिया पाहण्यासाठी देवांनी आपल्याला डोळे दिले आहेत. परंतु आपण त्यांची योग्य ती काळजी घेत नाही, हे वास्तव आहे.
खरे म्हणजे चाळीशीच्या आसपास प्रत्येकाला चष्मा आवश्यक वाटू लागतो. दृष्टीत फरक पडणे ही वयानुरुप होणारी बाब आहे. चाळीशीनंतर आपल्या डोळय़ांतील भिंगांची लवचिकता कमी होते. परिणामी जवळच्या वस्तु स्पष्ट आणि नीट दिसू शकत नाहीत. दृष्टी ही एका ठिकाणी केंद्रित होत नाही. वयामुळे डोळय़ांच्या रेटिनाच्या मधल्या भागावर परिणाम झाल्याने दृष्टी कमी होते. म्हणूनच डोळे तपासताना डोळय़ांतील द्रवाचा डाग आणि मागील पडदा यांचीही तपासणी आवश्यक असते. ज्यांना उच्च किंवा कमी रक्तदाब, हृदयविकार आहे अशांना रेटिनाचा उपद्रव अधिक वाढण्याची शक्मयता असते. डोळा हा कॅमेराप्रमाणेच काम करतो. कॅमेऱयाची लेन्स जसे काम करते तसेच डोळाही काम करतो.
डोळय़ाची तपासणी चाळीशीनंतरच करावी असे नाही. मूल जेव्हा पाच वर्षांचे होऊन वाचू लागते तेव्हा त्याचे डोळे तपासणी आवश्यक आहे. शाळेत अशी तपासणी होणे आवश्यक आहे. कारण बऱयाचदा मुलांना आपल्याला नीट दिसते की नाही, हे सांगता येत नाही.
संगणकचा अतिवापर
आज प्रत्येक जण मोबाईल, संगणक, लॅपटॉप, आयपॅड वापरत असतो. परंतु या साधनांचा ताण वाचनाने पडणाऱया ताणापेक्षा चारपट अधिक आहे. म्हणूनच प्रत्येक 20 मिनिटांनंतर 20 फुटांवर असलेल्या एखाद्या वस्तुकडे 20 सेकंद बघावे. त्यामुळे सतत पडद्याकडे डोळय़ांवर आलेला ताण कमी होतो.
मोतिबिंदू
वयोमानामुळे दृष्टीदोष होण्याचे कारण म्हणजे मोतिबिंदू. आज ही शस्त्रक्रिया सोपी झाली आहे व बरे होण्याची प्रक्रियाही लवकर होते. शस्त्रक्रिया झाल्याच्या दुसऱयाच दिवशी रुग्ण कामावर राहू शकतो. मायक्रो इन्सीजन कॅट्रक्ट सर्जरी या आधुनिक शस्त्रक्रियेमुळे मोतिबिंदूचे निवारण व नवीन लेन्स बसविणे सोपे झाले आहे. टाक्मयांची गरजच भासत नाही, हे महत्त्वाचे.
काचबिंदू
डोळय़ांतील द्रवाचा दाब वाढल्यास ऑप्टीक नर्व्हला म्हणजेच ‘द्रुक चेतनी’ला इजा पोहोचते. द्रुक चेतनी डोळय़ांनी जे पाहिले ते मेंदूपर्यंत पोहोचविते. चाळीशीनंतर हा धोका वाढतो आणि दृष्टी मंदावते. कोपऱयातून पाहताना नीट दिसत नाही म्हणजे वाहन चालविताना बाजूने येणारी वाहने स्पष्ट दिसत नाहीत. यासाठी नेत्रतज्ञांचा सल्ला, तपासणी आवश्यक आहे. जितके लवकर निदान तितके उपचार सुकर होतात.
ज्यांना बीपी आहे त्यांनी गोळय़ा नियमित घ्याव्यात. काचबिंदूसाठी नेत्रतज्ञांनी दिलेले औषध नियमित वापरावे. डोळय़ांतील द्रवाचा दाब हा 10-20 मिलीमिटर इतका असला पाहिजे.
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि डोळे
मधुमेह व उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांमध्ये बदल होऊ लागतो. रेटिनाला योग्य रक्तपुरवठा होत नाही. त्याचा परिणाम होऊन अंधत्व येण्याचा धोका आहे. दृष्टी अंधुक होत कायमची जाऊ शकते, म्हणून लवकरात लवकर निदान आवश्यक आहे. डोळय़ांना काही त्रास नसला तरी वर्षातून एकदा डोळे तपासणी आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसादिवशी डोळय़ांची तपासणी करून घेणे उत्तम ठरेल.
मॅक्युलर डी जनरेशन
साठीनंतर रेटिनाला होणारा हा उपद्रव आहे. रुग्णाला सरळ रेषा न दिसता नागमोडी रेषा दिसतात. काहींची दृष्टी कमी होते. याला ड्राय एएमडी असे म्हणतात. काही जणांमध्ये ही क्रिया वेगाने होते. तिला वेटएएमडी म्हणतात. यासाठीही ओसीटीही बारकाईने निरीक्षक करण्याची पद्धत असून तिचा निदान करण्यासाठी उपयोग होतो. परंतु परिणाम किती झाला आहे हे समजू शकते.
डायट करणाऱयांना, धूम्रपान व मद्यपान करणाऱयांना याचा धोका अधिक असतो. योग्य आहार आणि व्यायामामुळे डोळाच नव्हे तर शरीराला होणारे अनेक आजार टाळता येतात.
डोळय़ांमध्ये तांबूस छटा दिसल्यास नेत्रतज्ञाला दाखवावे. डोळय़ांचा प्रत्येक विकार किंवा लालसरपणा म्हणजे डोळे येणे नव्हे. डोळे येणे हा जंतू संसर्ग आहे, तो स्पर्शातून पसरतो. डोळे चोळू नयेत, त्यामुळे संसर्ग रोग कमी होतो. डोळय़ांसाठी गाजर, पालेभाज्या, अंडी, मटण उपयुक्त आहे.
नेत्रदान
कोणालाही नेत्रदान करता येते. प्रत्येक नेत्रतज्ञांकडे त्याचे फॉर्म असतात. फॉर्म भरल्यावर प्रतिज्ञा कार्ड दिले जाते. नेत्रदान केलेल्या व्यक्तीने कुटुंबीयांना माहिती देणे आवश्यक आहे. मृत्युनंतर सहा तासांच्या आत डोळय़ातील कॉर्निया काढून तपासणीसाठी आय बँकेकडे दिला जातो. एका व्यक्तीमुळे दोन जणांना दृष्टी मिळू शकते.
मुलांमधील डोळय़ांच्या समस्या
लहान मुलांमध्ये तिरळेपणा आढळल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. अन्यथा, हा डोळा अशक्त होऊन शिथिल होतो व बघण्याचे काम टाळू लागतो. चष्मा वापरल्याने तिरळेपणा जाण्याची शक्मयता असते तर काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मुलांमध्येही काचबिंदू, मोतीबिंदू असू शकतात. म्हणून नेत्रतज्ञाचा सल्ला आवश्यक आहे.
लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांनी उपजत व सहज मिळालेल्या डोळय़ांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्षभरातून एकदा तरी डोळे तपासणी गरजेची आहे.
वैद्यकीय संचालक डॉ. शिल्पा कोडकणी यांचे सुपर स्पेशालिटी आय सेंटर, बेळगाव
(शब्दांकन- आशा रतनजी)