ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले. मतदानानंतर भाजपने सुहास कांदे, काँग्रेच्या यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. तर काँग्रेसने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला होता. यामुळे मतमोजणीला विलंब झाला. साडेतीन तासांपासून मतमोजणी रखडली आहे.
तर आद्यप निवडणूक आयोगाची परवनगी मिळाली नसल्याने मतमोजणीला विलंब होणार असल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे आणि मंत्री राजेश टोपे तर काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार आणि सतेज पाटील मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. तर सेनेकडून मंत्री अनिल परब, अनिल देसाई उपस्थित आहेत.
महाविकास आघाडीकडून रवी राणा, सुधीर मुनगंटीवारांच्या मतावर आक्षेप
भाजपच्या आक्षेपांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल
शिवसेनाही निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार