यात्रोत्सवचा आज मुख्य दिवस : देवस्थान कमिटी व ग्रा. पं. कडून सर्व तयारी पूर्ण, धुळ्याचा वरंडा येथे भेटीचा सोहळा
वार्ताहर/ कणकुंबी
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो भाविक-भक्तांचे श्र्रद्धास्थान असलेल्या कणकुंबी येथील ग्रामदेवता श्री माउली देवीचा दर 12 वर्षांनी होणारा यात्रोत्सव यावषी 14 वर्षांनी होत असून 8 फेब्रुवारीपासून या उत्सवाला सुऊवात झाली आहे. आज रविवार दि. 12 फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून कणकुंबी, चिगुळे, कोदाळी, गुळंब, कळसगादे, केंद्रे वीजघर या माउलींची ऐतिहासिक भेट धुळ्याचा वरंडा येथे होणार आहे. आज लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्मयता आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला तिन्ही राज्यातील लाखो लोकांची उपस्थिती पाहता कणकुंबी ग्रामपंचायत व देवस्थान विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केलेली आहे. पौराणिक व ऐतिहासिक दाखल्यानुसार सात माउली देवींच्या (सात बहिणी) बहिणींच्या भेटीचा सोहळा दर बारा वर्षांनी होत असतो. दर बारा वर्षांनी गुऊ जेव्हा मकर राशीत येतो त्यावेळी कणकुंबी व चिगुळे येथील श्री माउली देवीच्या तीर्थकुंडातील पाणी एक ते दोन फूट वर येते व पांढरे शुभ्र दुधाप्रमाणे होते. या पर्वणीला गंगा भगीरथी अवतरली असे समजून बारा वर्षांनी या सर्व भगिनींच्या म्हणजे माउलींच्या भेटीचा सोहळा होत असतो. वास्तविक 2021 मध्ये हा होणारा सोहळा कोरोनामुळे दोन वर्षे पुढे ढकलण्यात आला.
धुळ्याचा वरंडा येथे भेटीचा सोहळा
महाराष्ट्रातील कोदाळी, गुळंब, कळसकादे,केंद्रे-वीजघर व चिगुळे येथील श्री माउलीदेवी कणकुंबीच्या श्री माउली देवीला भेटण्यासाठी सकाळी 8 वाजता धुळ्याच्या वरंड्याकडे येतात. कणकुंबी माउलीदेवी पालखीसह वाजतगाजत धुळ्याच्या वरंड्याकडे रवाना होते. सर्व माउली देवतांची या ठिकाणी भेट होते. तेथील सर्व धार्मिक व पारंपरिक विधी पार पडल्यानंतर सर्व माउली देवतांचे पुण्यक्षेत्र मलप्रभा नदी उगमस्थानावरील तीर्थघाटावर आगमन होते. त्या ठिकाणी गंगापूजन, आरती, देवतांना, स्नान व इतर धार्मिक विधी झाल्यानंतर या सर्व देवता कणकुंबी माउली देवीच्या सभामंडपामध्ये विराजमान होतात. आणि त्यानंतर माउली देवींच्या दर्शनासाठी भाविकांना खुला करण्यात येतो.
देवस्थान कमिटी व ग्रा. पं. कडून तयारी पूर्ण
आजचा दिवस यात्रोत्सवातील मुख्य दिवस असून कर्नाटकासह, महाराष्ट्र व गोव्यातील हजारो भाविक भक्त या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मंदिर विश्वस्त मंडळाने यात्राकाळात भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था बजावलेली आहे. बेळगाव, खानापूर येथून बसची व्यवस्था करण्यात आलेली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवलेला आहे. ग्रामपंचायतीने यात्रा काळात सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसलेली असून संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील सर्व रस्ते, गटारांची साफसफाई करण्यात आलेली असून ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यात्रेसाठी विशेष लाईटची व्यवस्था करण्यात आलेली असून सहा हायमास्ट बसविण्यात आले आहेत. तसेच ठिकठिकाणी 40 फोकस सोडण्यात आलेले आहे. त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात भाविक-भक्तांसाठी दोन मोबाईल टॉयलेट उभारण्यात आलेले आहेत. सहा ते सात पाण्याचे टँकर ठेवण्यात आलेले असून कचरा नियोजनासाठी कणकुंबी, पारवाड व जांबोटी ग्रामपंचायतीच्या कचरा गाड्या ठेवण्यात आलेल्या आहेत.