वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
येथील रुपसिंग स्टेडियमवर 1 मार्चपासून खेळविल्या जाणाऱया इराणी करंडक सामन्यात शेष भारत संघाचे नेतृत्व मयांक अगरवालकडे सोपविण्यात आले आहे. इराणी करंडकासाठी आता शेष भारत आणि मध्य प्रदेश यांच्यात हा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्या दुखापतीमुळे मुंबईचा सर्फराज खान सहभागी होऊ शकला नाही.
2023 च्या रणजी हंगामात अगरवालची कामगिरी समाधानकारक झाली असून त्याने 13 डावात 990 धावा जमविल्या असून त्यामध्ये सर्वोच्च 249 धावांच्या खेळीचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तिसरी कसोटी इंदोरमध्ये 1 मार्चपासून सुरु होणार असल्याने इराणी करंडक सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले. इराणी करंडक सामना आता इंदोर ऐवजी ग्वाल्हेरमध्ये खेळविला जाईल. मध्य प्रदेश संघाचे नेतृत्व हिमांशू मंत्रीकडे सोपविण्यात आले आहे.
शेष भारत संघ – मयांक अगरवाल (कर्णधार), घरमी, यशस्वी जैस्वाल, ईश्वरण, हार्विक देसाई, मुकेश कुमार, अतित सेठ, चेतन साकारिया, नवदीप सैनी, उपेंद्र यादव, मयांक मार्कंडेय, सौरभ कुमार, आकाश दीप, बी. इंद्रजीत, नारंग आणि यश धूल.