सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा मंचतर्फे मागणी
पणजी : म्हादई वन्यजीव अभयारण्याला ‘व्याघ्रक्षेत्र’ म्हणून अधिसूचित करण्यात यावे अशी मागणी सेव्ह म्हादई – सेव्ह गोवा या मंचतर्फे करण्यात आली आहे. गोव्यातील पश्चिम घाटात असलेले हे अभयारण्य लवकरच व्याघ्रक्षेत्रात आणणे गरजेचे आहे. ते केले तरच म्हादई वाचेल आणि गोवा सुरक्षित राहील. राज्य व केंद्र सरकारला त्यात ढवळाढवळ करता येणार नाही आणि म्हादईशी तर त्यांना कोणताच हस्तक्षेप करता येणार नाही, असे राजन घाटे यांनी सांगितले. राना-वनातील अलिकडेच लागलेल्या वा लावलेल्या आगींची चौकशी करण्यासाठी समिती, आयोग नेमण्याची मागणी घाटे यांनी केली आहे. व्याघ्रक्षेत्रासाठी राज्य सरकारला अधिकार देण्यात आले असून ते अभयारण्यात समाविष्ट करावे, असे घाटे म्हणाले.