सावंतवाडी / प्रतिनिधी
वंदे भारत रेल्वेला सावंतवाडी रोड स्टेशनला थांबा मिळू शकला नाही हे स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर यांचा समजायचं काय असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहर सर्वात मोठे शहरआहे . येथे मोठ्या संख्येने लोक राहतात परंतु रेल्वे खात्याने सावंतवाडी शहरावरती सतत अन्याय केला आहे. आमच्या सावंतवाडी शहराला जर थांबे द्यायचे नसतील तर असलेली थांबे रद्द करा असेही साळगावकर म्हणाले !