औरंगाबादच आणि उस्मानाबादचे नामकरण केल्याचे मिरजेत पडसाद
मिरज : औरंगाबादचे संभाजी नगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण प्रस्ताव मंजूर केल्याचा महाविकास आघाडीने जाहीर केले याचे मिरजेत पडसाद उमटले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने या नामकरणला पाठिंबा दिला याचा रोष व्यक्त करत कॉंग्रेस पक्षाचे कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम यांच्या डिजिटल फलकला एमआयएम सांगली जिल्ह्याच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
‘सेक्युलरिजमचा भुरखा पांघरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने हिंदुत्ववादाला पाठिंबा दिलाय. या नामकरणाला पाठिंबा देऊन या पक्षांनी सेक्युलरिजमला मूठमाती दिल्याचा आरोप सांगली जिल्हा एम.आय.एमचे जिल्हा अध्यक्ष महेश कांबळे यांनी केला आहे.