Rohit Pawar on Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्यावर विश्वास टाकावा असे अनेकांची मते नव्हती. पण 1998 मध्ये कार्यकर्ता माझा आहे म्हणत त्यांना संधी दिली.नेत्यांमुळे ताकद होती असे नाही. कार्यकर्ते सुद्धा महत्वाचे आहेत. अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही.आता निष्ठावंत कार्यकर्ते सांगत आहेत की पूर्वी पेक्षा जास्त ताकदीने लढू.काही नेत्यांनी पक्ष वाढू नये यासाठी प्रयत्न केला. पण आता दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.नेते फुटले पण कार्यकर्ते आमच्यासोबत कायम राहिले आहेत.दोन विचारांचा लढा उभा आहे, एक भाजपचा विचार तर दुसरा पुरोगामी विचार.गुजरातच्या नेत्यांना खुश करण्यात सत्ताधारी गुंतले आहेत.शिक्षण,नोकरी,व्यवसाय या प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही. पुढच्या 15 दिवसांत शिक्षण भरतीची प्रक्रिया सुरू झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.आज ते पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की,शरद पवार साहेबांची स्वाभिमान सभा उद्या दसरा चौकात होणार आहे.कोल्हापूर आणि साहेबांचं वेगळं नातं आहे, रक्ताचं नातं आहे.दसरा चौकात सभा घेण्याचं खास कारण आहे. कारण आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराने काम करतो. तो विचार या पवित्र ठिकाणाहून देण्याचा प्रयत्न आहे. सभेला कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व नागरिक स्वतःच्या गाडीने, खर्चाने या सभेला उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेसाठीची पहिली बैठक कोल्हापुरात झाली होती. लोकांच्या मनात पवार साहेब आहेत. भाजपच्या विरोधात लढायचे आहे, त्यामुळं कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत.शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला याचा अर्थ भाजपचा आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास राहिला नाही.आतापर्यंतच्या राजकारणात पवार साहेब भाजपच्या बाजूला कधी गेले नाहीत. इतकंच नाही तर पवार साहेब कधीही दिल्लीसमोर झुकले नाहीत.सांगलीमधील लोकल नेत्यांनी काही बोललं असेल त्यात काही तथ्य नाही. पवार कुटुंबात पवार येतातच पण राष्ट्रवादी काँग्रेस हा पवार साहेब यांचं कुटुंब आहे. शरद पवार साहेब यांचा सुरुवातीला मोठा फोटो लावला होता.कारण नागरिक चिडले होते. अजित पवार यांची पहिली मोठी सभा आहे. सभा तर होऊ द्या, काय टीका होते ते तर पाहू, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरातील दंगलीविषयी बोलताना ते म्हणाले की, कोल्हापुरात दोन महिन्यांपूर्वी जे घडलं ते बाहेरील नागरिकांनी घडवलं.लहान मुलं हातात दगड घेऊन उभा होते पण पोलीस बघत उभा होते. गृहविभागाच्या आदेशाची वाट पाहत होते, पण आदेश आला नाही.काही तरुणांनी चुकीचं घडवण्याचा प्रयत्न केला. पण, कोल्हापूरकरांनी मोठी दंगल होऊ दिली नाही. त्यामुळं कोल्हापूरकरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे.शाहू महाराज व्यासपीठावर येणार आहेत ते समतेचा विचार देण्यासाठी.कोणत्याही राजकारणासाठी शाहू महाराजांना व्यासपीठावर आणलं जात नाही. दसरा चौक हा ऐतिहासिक चौक आहे, तिथुन पुरोगामी विचार महाराष्ट्राला द्यायचा आहे. एमआयडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत.तशा तक्रारी आमच्याकडे आधी देखील आल्या होत्या. आता देखील येत आहेत. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अशा वातावरणात नवीन कंपन्या आपल्या जिल्ह्यात येत नाहीत.त्यामुळे तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जी श्वेतपत्रिका काढली त्यापेक्षा कोरा पेपर दाखवला असता तर बरं झालं असतं, असा टोलाही लगावला.