लम्पीचा धोका वाढताच, शेतकऱयांना फटका, पशुसंगोपनची झोप उडाली
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. मागील चार दिवसापासून दररोज 100 हून अधिक जनावरे दगावू लागली आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शिवाय पशुसंगोपन खात्याची लम्पीने झोप उडाली आहे. त्यामुळे रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मागील 3 महिन्यापासून जिल्हय़ात लम्पीचा प्रादुर्भाव सुरू आहे. विशेषतः बेळगाव, बैलहोंगल, रामदुर्ग, निपाणी, कागवाड तालुक्मयात लागण झालेल्या जनावरांची संख्या वाढत आहे. त्याबरोबर मृत्युमुखी पडणाऱया जनावरांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे पशुसंगोपन खात्याची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे. मागील आठवडय़ात दररोज लम्पीने दगावणाऱया जनावरांची संख्या 70 ते 80 होती. ती आता दररोज 100 च्या पुढे गेली आहे. त्यामुळे लम्पीचा धोका पुन्हा वाढला आहे. जनावरे दगावलेल्या मालकांना आर्थिक फटका सहन करावा लागत
आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत 25 हजार 124 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यापैकी 9 हजार 9 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. मात्र आतापर्यंत 2 हजार 191 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत सापडले आहेत. रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पशु संगोपनमार्फत लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम तीव्रपणे राबविली जात आहे. आतापर्यंत 4 लाख 9 हजार 970 जनावरांना लम्पीप्रतिबंधक लस देण्यात आली आहे. जिल्हय़ात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव, कुत्रा, मांजर आदींचा समावेश आहे. यामध्ये केवळ गोवर्गीय जनावरांना लम्पीची लागण होत आहे. जिल्हय़ात 70 हजारहून अधिक गोवर्गीय जनावरांची संख्या आहे. त्यापैकी 25 हजार 124 गोवर्गीय जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.
राज्य सरकारने लम्पीने दगावलेल्या जनावर मालकांना मदत जाहीर केली आहे. बैलासाठी 30 हजार रुपये, गाईसाठी 20 हजार रुपये तर वासरासाठी 5 हजार आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र सध्या बाजारभावाच्या तुलनेत देण्यात येणारी आर्थिक मदत तुटपुंजी असल्याचे बोलले जात आहे.
बाजारात बैलजोडीची किंमत 70 ते 80 हजार रुपये आहे. तर गाईची किंमत देखील 60 हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र मदत केवळ तुटपुंजी दिली जात आहे. हा केवळ नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.
ऐन सुगी हंगामात लम्पीचा धुमाकूळ
सुगी हंगामाला जोर आला आहे. बळीराजा सुगी हंगामाच्या कामात दंग झाला आहे. मात्र दुसरीकडे जिल्हय़ात लम्पीचा धुमाकूळ कायम आहे. त्यामुळे बळीराजासमोर संकट उभे ठाकले आहे. रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ झाला आहे. मात्र लम्पीने बैल दगावलेल्या शेतकऱयांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर काही शेतकऱयांच्या दुभत्या आणि गाभण गाईदेखील लम्पीने दगावल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक गणित कोलमडले आहे. एकूण जिल्हय़ातील दूध उत्पादनावर देखील लम्पीचा परिणाम झाला आहे.
लम्पीमुक्त जनावरांच्या संख्येत वाढ
मागील आठवडय़ापासून जिल्हय़ात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. शिवाय तातडीने लागण झालेल्या जनावरांवर उपचार केले जात आहेत. लम्पीमुक्त होणाऱया जनावरांची संख्यादेखील वाढत आहे. लवकरच रोगावर नियंत्रण येईल.
डॉ. राजीव कुलेर ( पशु संगोपन खाते)