आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे : डॉ अतुल पाटील
शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ शहरात गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत आहे. त्यामुळे विषाणू संसर्गामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. सध्या शहरात बदलत्या वातावरणामुळे डोळे येणारे आजार पसरत आहे. किमान 300 हून अधिक जणांना डोळे येण्याचा त्रास जाणवू लागला आहे विशेषता याचा त्रास लहान मुलांना अधिक जाणवत आहे.
याबाबत येथील बालरोगतज्ञ डॉ अतुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की परिसरात डोळे येण्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत विशेषता लहान मुलांच्यामध्ये या संसर्गजन्य आजाराचा वेगाने फैलाव होत आहे डोळे येणे या आजारामध्ये डोळे लाल होणे डोळ्यामधून पांढरट अथवा पिवळसर घाण येणे डोळ्यामधून पाणी वहाने डोळ्याभोवती सुज येणे डोळ्यात खाज अथवा वेदना होणे इत्यादी लक्षणें प्रामुख्याने आढळून येत आहेत शहरात असे 300 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या व्यक्तींनी काळा गॉगल अथवा चष्मा वापरावा टीव्ही व मोबाइलचा वापर कमी करावा.
डोळे स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ व सूती कपड्याचा वापर करावा डोळे स्वच्छ केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत आपल्या सोबतच्या व आजूबाजूच्या व्यक्तीबरोबर डोळ्यात डोळे घालून बोलू नये तसेच थोडे अंतर राखावे डोळे आलेल्या व्यक्तीचे रुमाल अथवा टॉवेलचा इतरांनी वापर करू नये संसर्ग झालेल्या व्यक्तीने डोळ्याला हात लावलेनंतर इतर वस्तू अथवा साहित्याला हात लावू नये बाहेरून आलेनंतर डोळे स्वच्छ अथवा कोमट पाण्याने धुवून घेणे तसेच या आजाराची गंभीर लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा नेत्ररोगतज्ञांची भेट घेऊन आवश्यक उपचार करून घेणे गरजेचे असल्याचे शेवटी डॉ अतुल पाटील यांनी सांगितले