प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरात भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात असंख्य नागरिक जखमी झाले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. अखेर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नसबंदी मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारपासून या मोहिमेंतर्गत भटक्मया कुत्र्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावण्यास सुरुवात करण्यात आली.
भटक्मया कुत्र्यांच्या उपद्रवामुळे शहरवासीय हैराण झाले आहेत. प्रत्येक गल्ली आणि भंगीबोळात ठाण मांडलेल्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडलेल्या प्रत्येक नागरिकांवर भटकी कुत्री धावून जात आहेत. तसेच दारात खेळणाऱया लहान मुलांवर हल्ले करण्याचे प्रकारही घडले आहेत. अलिकडेच शास्त्रीनगर परिसरात एका कुत्र्याने 12 जणांचा चावा घेतला होता. यामध्ये आठ बालकांचा समावेश आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली होती. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने यापूर्वीदेखील नसबंदी मोहीम राबविण्यासाठी निविदा काढल्या होत्या. पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही मोहीम रखडली होती. मात्र मे महिन्यात काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभल्याने नसबंदी मोहिमेस कंत्राटदार मिळाला आहे. या मोहिमेस प्रत्यक्षात शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे.
विविध ठिकाणी लावले सापळे
शुक्रवारी विविध भागातील भटकी कुत्री पकडून श्रीनगर येथील ऑपरेशन थिएटरमध्ये नसबंदी करण्यात आली. कुत्री पकडण्यासाठी कंत्राटदाराच्या पथकाने विविध ठिकाणी सापळे लावले होते. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवणार आहे.