तेलंगणा दौऱ्यात पंतप्रधानांची घोषणा : राज्यात 13,500 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ महबूबनगर
तेलंगणा दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याच्या केंद्राच्या निर्णयाची घोषणा केली. भारत हा हळदीचा प्रमुख उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार असून तेलंगणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन करतात. हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजा आणि भविष्यातील शक्मयता लक्षात घेऊन हळद मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले. हळदीप्रमाणेच चहा, कॉफी, मसाले, ताग, नारळ इत्यादींचे बोर्डही असून या मंडळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या इतर गरजा भागवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यास मदत केली जाते.
तेलंगणातील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधानांनी रविवारी भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) निवडणुकीचे बिगुल वाजवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणातील महबूबनगर येथे पोहोचून एका सभेला संबोधित केले. यावेळी तेलंगणातील लोकांना आता बदल हवा असून भाजपला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, व्हर्च्युअल माध्यमातून पंतप्रधानांनी 13,500 कोटी ऊपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. सदर प्रकल्प रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.
हळद उत्पादनकांना नवी संधी
कोविडनंतर हळदीबाबत जागऊकता निर्माण झाल्यापासून जागतिक मागणीही वाढली आहे. आज व्यावसायिक आणि उत्पादनापासून हळदीच्या निर्यातीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांची गरज आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन केंद्राने राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत हा हळदीचा प्रमुख उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. विशेषत: तेलंगणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतात. निजामाबाद, निर्मल आणि जगतियाल जिल्हे हळदीच्या मोठ्या लागवडीसाठी ओळखले जातात. येथून देशांतर्गत आणि व्यावसायिक गरजा भागवण्याबरोबरच हळदपूड विदेशात निर्यात केली जाते, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी रविवारी दुपारी महबूबनगरमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना आपल्या भाषणात काँग्रेस आणि सत्ताधारी बीआरएस या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. आज मला तेलंगणातील लोकांच्या कल्याणासाठी 13,500 कोटी ऊपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्याची संधी मिळाली. या प्रकल्पांमुळे तेलंगणाला प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचण्यास मदत होईल. या प्रकल्पांमुळे तेलंगणातील तऊणांसाठी संधी निर्माण होतील, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी नागपूर-विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉरशी संबंधित महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच भारतमाला प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या हैदराबाद-विशाखापट्टणम कॉरिडॉरशी संबंधित रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हैदराबाद (काचेगुडा-रायचूर) टेन सेवेला हिरवा झेंडा दाखवला.
मुख्यमंत्र्यांचा दुरावा
राज्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याने पंतप्रधानांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या दौऱ्यात पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सहभागी झाले नव्हते. केंद्रीय पर्यटनमंत्री आणि भाजप तेलंगणा युनिटचे अध्यक्ष जी. किशन रे•ाr यांनी शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली. विविध विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राव हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे टाळत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.