विट्यात राष्ट्रीय विणकर दिन विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा
विटा प्रतिनिधी
विणकर बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्व ओबीसींनी एकाच झेंड्याखाली एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
स्वातंत्र्य पुर्व काळात ०७ ॲागस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळ सुरु करण्यात आली. या अंतर्गत स्वदेशी उद्योगाना व विशेषतःहातमाग उद्योगास विशेष आधार दीला गेला होता. याच्या आठवणी कायम राहण्याच्या साठी केंद्र शासनाने २०१५ पासुन ०७ ॲागस्ट हा केंद्रिय हातमाग अर्थात वीणकर दिन म्हणुन जाहिर केला आहे. चालु वर्षी नववा हातमाग दिन देशभर उत्साहाने साजरा झाला.
महाराष्ट्र राज्य वीणकर संयुक्त कृती समितीच्या वतीने पुणे येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात राज्याचे मंत्री व ओबीसींचे नेते छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वीणकर दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी राज्यभरातुन वीणकर समाज एकत्रीत आला होता.
वीणकर दिनानिमीत्त विटा येथील श्री चौंडेश्वरी मंदिरातही गुढी पुजन, महाआरती, कतृत्वान महिला आणि अधिकाऱ्यांचा सन्मान, जिलेबी वाटप असे विविध कार्यक्रम पार पडले.
देवांग समाज अध्यक्ष दत्तात्रय चोथे, उत्तम चोथे, किरण तारळेकर, मारुती तारळेकर, सुरेश म्हेत्रे, वैभव म्हेत्रे,अविनाश चोथे, सांगली महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, विटा पालीका उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर, कुमार लोटके, सुभाष कवडे, महालिंग लोटके, दत्तात्रय म्हेत्रे, नारायण उंटवाले, शिवाजीराव कलढोणे, प्रमोद रोकडे, सुभाष चोथे, दगडु दाते, माधव रोकडे, नितीन दिवटे, विपुल तारळेकर, दिलीप टेके, अनिल चोथे, महेश फासे, अविनाश चोथे, दिपक चोथे, शरद रोकडे, कृषी म्हेत्रे, प्रविण दाते, तुळशीराम चोथे, संतोष तारळकर, विनोद तावरे, प्रतिभा चोथे यांच्यासह वीणकर समाजबांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.