राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पद्धत काय असेल, सरकारची दिशा कोणती असेल याचा उलगडा विश्वासदर्शक ठरावानंतरच्या बेभान भाषणबाजीतून झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित नसलेला अलभ्य लाभ त्यांना पेलता आणि पचवता आला पाहिजे. एरवी मितभाषी वगैरे म्हणून त्यांना गौरवले जात असले तरी पदावर आरूढ झाल्यानंतर भावनेच्या भरात त्यांनी जी ‘पोलखोल’ केली आहे ती महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर दाखवणारी आहे. शिंदे यांनी 2024 च्या निवडणुकीत दोनशे जागा जिंकून दाखवण्याची वल्गना केली आहे. आधी काम तरी करा, राज्याचा विकास करा, शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटवून दाखवा, त्यासाठी शेतकऱयांच्या हिताचे निर्णय घ्या. महागाईने त्रासून गेलेल्या जनतेला दिलासा मिळेल असा कारभार करून दाखवा. मग, दोनशे जागा जिंकण्याचा अभिनिवेश दाखवण्याची वेळ येणारच नाही. अजून कशात काही नसताना दोनशे जागा जिंकतो, हा आविर्भाव कशाला? राजकारण हे करियर नाही. ती लोकसेवा आहे. राजकारण म्हणजे निस्वार्थीपणा, वेळ पडली तर पदराला खार लावून घ्यावा लागतो. पण महाराष्ट्राच्या विधानसभेतील नव्या सरकारच्या नि÷sबाबत शंका घ्यावी असे विचार भाषणांमधून व्यक्त केले गेले. शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्येच मुख्यमंत्री होणार होतो, पण पक्षातील काही लोकांनी विरोध केला.’’ याचा अर्थ मुख्यमंत्री होणे हेच त्यांचे ध्येय होते, असे वाटते. मूळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार राज्यात यावे, ही जनतेची इच्छा नव्हती. ज्ये÷ नेते शरद पवार यांनी केलेला तो खेळ होता. उद्धव ठाकरे हे हस्तीदंती मनोऱयातील मुख्यमंत्री होऊन बसले होते. त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही ही गोष्ट खरी असली तर ‘बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच,’ ही निवडणूक प्रचारातील त्यांची भूमिका वेळ आली की बदलली. मग, जिथे आपला नेताच पलटतो, तिथे आपण नि÷ा वाहायची ती कुणाच्या पायावर? असा सवाल त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण न झाला तरंच नवल. एकनाथ शिंदे आजही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत आहेत ते केवळ सोयीसाठी. सत्तेत महत्त्वाचे पद मिळवण्यासाठी आणि आता सत्ता टिकवण्यासाठी. आमदारांची जोड-तोड करून निर्माण झालेली सत्ता खरी नसते, जनतेने दिलेला कौल महत्त्वाचा असतो. यापूर्वीच्या अशा सरकारांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नव्हता. खरे तर, उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन यापूर्वी नारायण राणे बाहेर पडले, राज ठाकरे यांनीही नवा पक्ष स्थापन केला आणि आता एकनाथ शिंदेंनी निवडून आलेले सगळे आमदार फोडून आपली शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. उद्धव यांच्या बाबतीत इजा-बिजा आणि तिजा झालेला आहे. ‘बाळासाहेबांचे नाव घेता आणि त्यांच्या पुत्रालाच मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करता,’ अशी दूषणे त्यांनी शिंदे व त्यांच्या सहकाऱयांना दिली, यावरूनच त्यांनी आपली नेमकी पात्रता सिद्ध केली. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी त्यांनी सगळय़ा खेळखंडोब्याला सुरूवात केली. त्यातून खदखद वाढत गेली. राज्याचा विकास आणि प्रगती दूरच, सर्वसामान्य माणसाला दिवसेंदिवस जगणे मुश्कील होत आहे. कोरोनाच्या साथीने कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. व्यवसाय-उद्योगांना घरघर लागली. नोकऱया गेल्या. अनेकजण कर्जबाजारी झाले. पण सत्ताधारी माणसांची कुलंगडी-भांडणे मात्र वाढत गेली. सामान्य माणसाला या राजकारणात काडीचाही रस नाही. त्यांच्या ताटातील भाकरी नाहीशी होत असताना या बेभान बडबडय़ा राजकारण्यांवर त्यांचा विश्वास राहणे शक्मय नाही. जून महिना गेला, जुलैचा पहिला आठवडा संपत आला. राज्याच्या अनेक भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी चिंतातूर झाला आहे. खरीप हंगाम वाया जाण्यासारखी स्थिती आहे. दुसरीकडे, मंत्रिमंडळाची रचना व्हायची आहे. अनेकांनी त्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मंत्रीपदावर डोळा ठेवून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखेपाटील आणि अन्य आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘लॉबींग’ करून मंत्रीपदे मिळवल्यानंतर जनतेच्या समस्या त्यांच्या खात्याकडून सुटतील असे समजणे म्हणजे कल्पनाविलासच! आपण मांडलेला सत्तेचा सारीपाट उधळला आहे याची खंत शरद पवार यांच्यासारख्या मुत्सद्याला शांत बसू देणारी नाही. ते शांतपणे चाल करून येतीलच. अजित पवार विरोधी पक्षनेते झाले असले तरी कधी, कोणता निर्णय घेतील ते सांगता येत नाही. दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे दीपक केसरकरांसारखे अनेक आमदार यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून आलेले आहेत. सांगोल्याच्या शहाजी पाटलांसारखे आमदार आज ‘एकनाथ हेच आपले नाथ’ असे उच्चरवात सांगत असले तरी तेदेखील एकाच पक्षात राहिलेले नाहीत. भाजप आणि एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेत असे पक्षांतर करून आलेले आमदार मोठय़ा प्रमाणावर असताना, कोण कुणाचा चाकर आणि कोण कुणाचा मालक, सगळय़ांचीच बोली मिथ्या आणि कृती कृतक असल्याचे ध्यानात येते. अगदी कालपर्यंत शिवसेनेकडे ‘परत फिरा रे’ म्हणून गळा काढून रडणारे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनीही ‘टाटा-बाय बाय’ करीत एकनाथांचा गट जवळ केला आहे. यात मोठी गोची झाली आहे ती आमदार एकनाथ खडसे यांची. थोडक्मयात, जनतेने डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी या नव्या सरकारची स्थिती नाही. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सगळय़ांनाच वेळोवेळी टोचणी देण्याची गरज आहे. सत्ता भोगून मंदावलेल्या विरोधी पक्षांकडून ते शक्मय नाही. जनतेतूनच त्यासाठी उठाव व्हायला हवा. सत्ताकेंद्री राजकारणी जनताभिमुख होण्यासाठी लोकांनीच जागरूक राहण्याची वेळ आली आहे.
Previous Article‘टीव्ही अँकर’वरून 2 राज्यांचे पोलीस आमने-सामने
Next Article अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 6 जणांचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.