पंधरा – वीस दिवस अगोदच आवक ः कांदा पाहण्यासाठी व्यापारी – शेतकऱयांची दुकातान गर्दी
वार्ताहर/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेत शनिवारच्या बाजारात कर्नाटकातील यंदाच्या हंगामातील नवीन कांद्याची आवक विक्रीसाठी दाखल झाली आहे. कांदा-बटाटा भाव स्थिर झाला आहे. भाजी मार्केटमध्ये दोडकी, वांगी, कोबी, हिरवी मिरची या भाजीपाल्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली तर इतर भाजी पाल्याचे दर स्थिर असून टोमॅटो दरात घसरण झाली आहे.
दरवर्षी कर्नाटकातील नवीन कांद्याची आवक गणेश चतुर्थीनंतर बाजारात विक्रीसाठी होते. मात्र यंदा पंधरा-वीस दिवस आगोदरच कर्नाटकातील कांद्याची आवक झाली आहे. सुमारे 30 पिशव्या आवक विक्रीसाठी दाखल झाली आहे. नवीन कांदा पाहण्यासाठी व्यापारी व शेतकऱयांची दुकानामध्ये गर्दी झाली होती.
सबसिडीद्वारे कांद्या बियांचे वाटप
भारतामधून बांगला देशामध्ये मोठय़ा प्रमाणात कांदा निर्यात केला जातो. मात्र कोरोनामुळे बांगलादेशाहून भारताला येणारी कांद्याची रक्कम येण्यास विलंब होत आहे. यामुळे बांगला देशाला काही अटी घालून थोडय़ा प्रमाणात कांदा निर्यात करण्यात येत आहे. आणि बांगला देशाने आपल्या देशातील शेतकऱयांना कांदा उत्पादनावर भर देण्यास सांगितले आहे. आणि सबसिडीद्वारे कांदा बियाचे वाटप करीत आहे. यामुळे यंदा कांद्याचा भाव वाढला नसल्याची माहिती अडत व्यापाऱयांनी दिली.
इंदूर, आग्रा बटाटय़ाला अधिक दर
हासन, केरळ, उडुपी राज्यामध्ये अतीवृष्टीमुळे पावसामुळे बटाटा पीक वाया गेले आहेत. यंदा बेळगाव, चंदगड, खानापूर, तालुक्यांमध्ये बटाटा लागवड 50 टक्के झाली आहे. यामुळे पुढील काळात इंदूर, आग्रा बटाटय़ावर अवलंबून रहावे लागणार असल्यामुळे इंदूर – आग्रा व्यापारी सध्या बटाटय़ाची कृत्रीम टंचाई करीत आहेत. शितगृहामधील बटाटा आपल्या मर्जीप्रमाणे भाव देणाऱया राज्यामध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत. यामुळे बेळगाव बाजारातही याची कमतरता भासत आहे. गोवा आणि कोकण पट्टा संपूर्ण बेळगाव बाजारावर अवलंबून आहे.
दोडकी, वांगी, कोबी, हिरव्या मिरची दरात वाढ
यंदा पावसाळा व उन्हाळय़ामध्ये भाजीपाल्याचे दर टिकूनच आहेत. एकीकडे अतिवृष्टीमुळे शिवारात पाणी साचून भाजी पाल्यांचे नुकसान झाले आहे. गोवा राज्यामधील सावडी, फोंडा, साखळी आणि कोकणपट्टा या भागातील बहुतांश नागरिक मांसाहार सेवन करत नाहीत. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये येथील नागरिकांकडून भाजीपाल्याची दुप्पट मागणी होत आहे. यामुळे भाजी पाल्याचे दर टिकून आहेत. दोडकी, वांगी, कोबी, हिरव्या मिरचीचे उत्पादन घटल्यामुळे या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
टोमॅटो दरात घसरण
तसेच कोलारमध्ये टोमॅटोचे उत्पादन भरमसाठ आहे. आणि बेळगाव राज्यामध्येही उत्पादन वाढले असल्याने टोमॅटो दरात घसरण झाल्याची माहिती भाजी व्यापाऱयांनी दिली.