नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : डेंग्यू ऊग्ण असलेल्या भागात उपाययोजना जारी
पणजी : गोव्यासाठी येत्या सहा महिन्यात नवीन नगर-नियोजन (टीसीपी)कायदा करण्यात येणार असल्याची माहिती नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. डेंग्युचे रुग्ण सापडत असलेल्या भागात उपाययोजना सुरु केली असून लोकांनी ताप आपल्यास सावध व्हावे, असे आवाहनही आरोग्यमंत्री म्हणून राणे यांनी केले आहे. राणे म्हणाले की, आपले वडिल प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना 1970 मध्ये हा कायदा आणला होता. त्यात अद्याप बदल झालेला नाही. आता कायदा बदलण्याची वेळ आली असून ती काळाची गरज बनली आहे. सहा महिन्यात तयार करण्यात येणारा नवीन कायदा जनताभिमूख असेल आणि तो जनतेला त्रासदायक ठरणार नाही, याची काळजी घेणार असल्याची ग्वाहीही मंत्री राणे यांनी काल सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.
डेंग्युमुळे 16 जणांचे बळी
जानेवारी ते आतापर्यंत गोव्यात डेंग्यूमुळे 16 जण बळी पडले असून त्यातील काही जणांना डेंग्यू व्यतिरिक्त इतर आजार होते. त्यामुळे त्या बळींची पडताळणी सुऊ असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
डेंग्यु नियंत्रणासाठी ‘एसओपी’
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याचे निवारण करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे (एसओपी) लवकरच जारी होणार असून त्याची कार्यवाही सर्व डॉक्टर्स तसेच आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना करावी लागणार असल्याचे राणे यांनी नमूद केले.
ताप आल्यास काळजी घ्यावी
लोकांनी ताप आल्यास स्वत: तपासणी करावी आणि डेंग्यू चाचणी कऊन घ्यावी, त्यासाठी उशीर कऊ नये, असेही त्यांनी बजावले. डेंग्यूवर आरोग्य खाते लक्ष ठेवून आहे आणि जे काही हॉटस्पॉट आहेत तेथे फवारणी व इतर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राणे म्हणाले.
गांधी जयंतीदिनी स्वच्छता अभियान राबविणार
आपल्याकडे असलेल्या सर्व खात्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून तशा सूचना सर्व खात्यांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व खाते प्रमुखांची बैठक घेतल्याचे राणे यांनी पुढे सांगितले. दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये (हॉस्पिसियो) जादा आरोग्य सुविधा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून 29 सप्टेंबर रोजी गोमेकॉत ‘पॅथलॅब’चा शुभारंभ करण्याचा इरादा असल्याचे राणे यांनी बोलून दाखवले. चांगले डॉक्टर्स आणण्यासाठी प्रयत्न चालू असून ज्यादा मनुष्यबळाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून या प्रकरणी पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. वास्को, पणजी, चिंबल येथे डेंग्यू प्रकरणे वाढल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.