राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांचे आवाहन : ग्रामीण भागाची ओळख निसर्ग संपदेतून पुढे येईल
प्रतिनिधी /पेडणे
देशाची प्रगती ही ग्रामीण भागाच्या विकासावर अवलंबून आहे. गोवा राज्यातही पंचायत क्षेत्रांचा विकास चांगल्या पद्धतीने होत असून आजही ग्रामीण भागात चांगला निसर्ग पाहायला मिळत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात सुंदर निसर्ग आणि परिसर पाहायला मिळतो. पेडणेचा हा निसर्ग पंचायत मंडळाने राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून ग्रामीण भागाची ओळख निसर्गात संपदेतून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई केले.
राज्यपालांनी धारगळ येथील सभागृहात बैठक घेऊन पेडणे मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच तसेच पंच सदस्यांची चर्चा केली. यावेळी व्यासपीठावर धारगळ जि. पं. सदस्य मनोहर धारगळकर, तोरसे जि. पं. सदस्य सीमा खडपे, धारगळ सरपंच अनिकेत साळगावकर, कोरगाव सरपंच समील भाटलेकर, पोरसकडे अमेरे खाजने सरपंच निशा हळदणकर, उगवे मोप तांबोसे सरपंच सुबोध महाले, तोरसे सरपंच प्रार्थना मोटे, कासारवर्णे सरपंच सुवर्णा केणी, वझरी सरपंच अनिल शेटय़े, इब्रामपूर हणखणे सरपंच अशोक धावसकर, चांदेल हंसापूर सरपंच तुळशीदास गावस, हळर्ण तळर्ण उपसरपंच नारायण राऊळ, विर्नोडा सरपंच सुजाता ठाकूर, राज्यपालाचे सचिव मिहिर वर्धन, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, गटविकास अधिकारी मनीष केदार, अधिकारी संजू गावकर उपस्थित होते.
राजभवन हे लोक भवन ठरावे : राज्यपाल पिल्लई
गोव्यात आपण संपूर्ण राज्याच्या तालुक्मयाचा दौरा करत असताना आपल्याला विविध अनुभव आणि विविध प्रकारची माणसे भेटतात. ग्रामीण भागाला भेट दिल्यानंतर जो आनंद मिळतो त्याचं वर्णन करण्याच्या पलीकडे आहे. मात्र ग्रामीण भागाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पंचायतस्तरावर लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताच्या दृष्टीने काम करावे. मी तुमच्याकडे आलो आता तुम्ही राजभवनावर यावे. यामाध्यमातून राज्यभवन हे खऱया अर्थाने लोकभवन ठरावे, असे उद्गार यावेळी राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी काढले.
पेडणे मतदारसंघातील डायलिसिसच्या 14 रुग्णांना यावेळी राज्यपाल यांनी अर्थसाहाय्याचे धनादेश प्रदान केले. यापुढे 70 कर्करोगाचे रुग्ण , टी.बी. चे 70 रुग्ण आणि डायलिसिसच्या 70 रुग्णांना आर्थिक साहाय्य दिले जाईल. यावेळी राज्यपालंनी जाहीर केले.
पेडणेत रविंद्र भवन उभारावे !
पेडण्यातील कलाकारासाठी रवींद्र भवनचा प्रस्ताव राज्यपालांनी सरकारकडे द्यावा तसेच सावळवाडा येथील इंडोअर स्टेडियम आणि क्रीडामैदान पेडणेतील खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न कारावे, अशी मागणी सुबोध महाले यांनी केली. पेडणे मतदारसंघात येणाऱया मोठमोठय़ा प्रकल्पासाठी शुद्ध पाण्याची क्षमता पुरवण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी तुळशीदास गावस यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरपंच अनिकेत सागावकर यांनी केले. शाल श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन राज्यपालांचा धारगळ सरपंच अनिकेत साळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सुरुवातीला लोकशिक्षण हायस्कूल धारगळ यांच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन क्लिप वाझ यांनी केले तर सतीश धुमाळ यांनी आभार राज्यपाल तसेच उपस्थितांचे आभार मानले.