प्रतिनिधी /वाळपई
वाळपई भागामध्ये भटकी व बेवारस गुरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढू लागली असून सदर भटक्मया गुरावर बंदोबस्त करा व अशा प्रकारची मागणी अनेकवेळा करण्यात आली . मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे .आज संध्याकाळी वाळपई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तेली बिल्डिंगच्या दुसऱया मजल्यावर एक बैल अडकला. dयामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली .शेवटी वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन त्याचे प्राण वाचविले.
dयाबाबतची माहिती अशी की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तेली कुटुंबीयांची इमारत आहे. या इमारतीच्या पायऱयावरून चढून सदर बैल दुसऱया मजल्यावर पोहोचला. या संदर्भाचा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ निर्माण झाली. सदर बैलाचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. मात्र तो अयशस्वी ठरला .शेवटी वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे
हवालदार अनंत गावस, यांच्यासोबत दलाचे जवान अरविंद देसाई ,कृष्णा नाईक, महादेव गावडे, गंगाराम पावणे सोमनाथ गावकर
यांनी प्रयत्न करून शेवटी त्या बैलाचे प्राण वाचविले. दुसऱया मजल्यावरून सदर बैल सुखरूपपणे खाली आला व शेवटी नागरिकांचा जीव भांडय़ात पडला.
दरम्यान वाळपईच्या बाजारामध्ये भटक्मया गुरांची संख्या बेसुमारपणे वाढलेली आहे. सदर गुरांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे .मात्र अजून पर्यंत त्याच्यावर कोणीही लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा घटनांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढते व अग्निशामक दलाच्या यंत्रणेला नाहक त्रास सहन करावे लागतात असे यावेळी नागरिकांनी स्पष्ट केले.