Parshuram Ghat : आज पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढलयं.मुसळधार पावसामुळे चिपळूण जवळील परशुराम घाटात दरड कोसळली. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक सध्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.युध्द पातळीवर माती हटवण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने सुरु आहे.
गेल्या दोन वर्षापासून महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु आहे. अर्धवट डोंगर कापल्याने माती खाली आल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे. सध्या दगडी टाकण्याचे काम सुरु आहे.दगडावरून वाहतूक सुरु होईल, अशी माहिती समोर आली आहे.लोटे-चिरणी कळंबस्ते मार्गानं हलकी वाहतूक वळवली आहे. मात्र अवजड वाहने थांबवली आहेत.