आतापासून कामाला लागणे गरजेचे : नदीकाठावरील नागरिकांच्या सोयीसाठी पावले उचलण्याची आवश्यकता
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये मान्सूनच्या सुरूवातीलाच जिह्यामध्ये पुराची परिस्थिती उद्भवत आहे. अंदमान, निकोबार परिसरात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे आणखी 10 ते 12 दिवसांत बेळगाव जिह्यामध्येही मान्सूनचे आगमन होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच पुरापासून बचाव करण्यासाठी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बैठक घेवून अधिकाऱयांना याबाबत सूचना केल्या होत्या. आता नूतन जिल्हाधिकाऱयांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावषी वळिवानेही मोठा दणका दिला आहे. जीवितहानी बरोबरच हेस्कॉमचे मोठे नुकसान या वळिवाने केले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पावसाने कहर केला असून आता मान्सूनचीही अधिक काळजी करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवषी जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये जिह्यातील काही भागांना पुराचा धोका पोहोचत आहे. यामध्ये कृष्णा नदीकाठाला अधिक फटका बसत आहे.
नदीकाठावरील गावांना मोठा धोका
महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडले जाते. यासाठी आतापासूनच तयारीला लागण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या असलेल्या बोटी तयार ठेवा, त्यांची दुरुस्ती करायची असेल तर आताच करणे गरजेचे आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अन्यथा नदीकाठावरील गावांना मोठा धोका पोहचू शकतो. जिल्हा प्रशासनाने पूर, आग याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमुळे जी हानी होते ती टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी आतापासूनच नियोजन असणे महत्त्वाचे आहे. पुरामुळे मोठी होनी होतेच. जर आपत्ती निर्मूलनासाठी आतापासून प्रशासनाने काळजी घेतली तर हा धोका टाळता येतो. सध्या पावसाळय़ापूर्वी पूरग्रस्त भागात आतापासून तयारी करणे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन वर्षांची परिस्थिती पाहता मान्सूनने सुरुवातीलाच मोठा दणका दिला आहे.
दरवषीच्या मागणीकडे शासनाचा कानाडोळा
महत्त्वाचे म्हणजे नदीकाठावर असलेल्या काही गावांमधील घरे धोकादायक आहेत. त्यांचा सर्व्हे करून आणि त्यांना आताच इतरत्र जागा देवून त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. वीजखांब कोसळून तसेच शॉर्टसर्किटने आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच विद्युत तारा तुटून पडल्यानंतर त्याला स्पर्श होऊन अनेकांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा हेस्कॉमनेही अशा धोकादायक विद्युत तारा व कलंडलेले विद्युतखांब पावसाळय़ापूर्वीच हटवावे, अशी मागणी होत आहे. मात्र दरवषी या मागणीकडे कानाडोळा करून नागरिकांचा जीव धोक्मयात घालण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
कृष्णा व वेदगंगा नदीकाठावरील गावांना मोठा फटका दरवषी बसत आहे. त्यामुळे असा पूर आला तर धोका निर्माण होवू नये यासाठी आतापासून सर्व्हे करण्यासाठी प्रशासनाने आतापासून कामाला लागणे गरजेचे आहे. तेव्हा धोकादायक झाडेही पावसाळय़ापूर्वीच हटविण्यासाठी वनखाते आणि हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी कामाला लागणे गरजेचे आहे. एकूणच कोणतीही आपत्ती येण्यापूर्वीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देवून आतापासून कामाला लागावे, अशी मागणी होत आहे.