पुणे दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुरस्कार सोहऴ्यात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी झाल्याने ते इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफार, बाळासाहेब देवरस होते, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह अशा लोकांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या यादिमध्ये पंतप्रधानांचे नाव सामिल झाल्याने आपल्या सगळ्यांना आनंद झाला असून मी त्यांचे अंतकरणापासून अभिनंदन करतो असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले, “लोकमान्यांच्या १०३ व्या पुण्यतिथीचा सोहळा ऐतिहासिक पुणे शहरात होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की देशात पुण्याचं एक वेगळं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरीवर झाला. आपल्या देशात अनेक राजे महाराजे होऊन गेले. मुघल असतील किंवा यादवाचं संस्थान असेल पण शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं. आणि हे रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम पुण्यात झालं हा पुण्याचा गौरव आहे” पुढे बोलताना त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर भाष्य केले ते म्हणाले “आलिकडे आपल्या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला, देशातील पहीला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी शाहीस्तेखानाची बोटे कापून केला होता.
पुढे बोलताना त्यांनी “लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची मशाल पेटवली. ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देण्याचे काम टिळकांनी केलं. वृत्तपत्रांच्या माध्यमांतून टिळकांनी इंग्रजांवर दबाव आणला. तसेच स्वातंत्र्य चळवळीला टिळकांनी दिशा दिली. अशा लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे त्यांचा आनंद आहे” असेही त्यांनी म्हटले आहे.