काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा आरोप ः सामाजिक सौहार्दाला पोहोचविला धक्का
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एक लेख लिहीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकार मतदारांचे ध्रुवीकरण करत असून सामाजिक सौहार्दाला जाणूनबुजून धक्का पोहोचवित असल्याचा आरोप केला आहे.
देशाची सत्ता मागील 8 वर्षांमध्ये मूठभर राजकीय नेते आणि व्यापाऱयांच्या हातात केंद्रित झाली आहे. यामुळे भारताची लोकशाही आणि लोकशाहीवादी संस्था कमकुवत होत आहेत. घटनात्मक मूल्ये आणि तत्वांवर आक्रमण केले जात असल्याचा आरोप सोनियांनी केला आहे.
इलेक्शन बाँड आणि क्रोनिजमद्वारे तयार करण्यात आलेल्या धनबळाद्वारे निवडणुकीच्या निकालांना प्रभावित केले जात आहे. शासकीय यंत्रणा वर्तमान सरकारला विरोध करणाऱया कुठल्याही पक्षामागे कारवाईचा ससेमिरा लावत असल्याचे सोनिया गांधींनी नमूद पेले आहे.
कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काँग्रेसकडून आयोजित होणाऱया भारत जोडो यात्रेदम्यान सोनिया गांधींनी हा लेख लिहिला आहे. या यात्रेद्वारे काँग्रेस पक्ष स्वतःचा प्रभाव वाढवू पाहत आहे. या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य नेते सामील झाले आहेत. या यात्रेची सुरुवात मागील आठवडय़ात तामिळनाडूतून झाली असून यात्रा आता केरळमध्ये पोहोचली आहे.
सरकारी उद्योगांना खिळखिळे करत ते एक किंवा दोन लोकांना विकण्यात येत आहेत. तर संपुआ सरकारच्या काळात जलद विकास आणि वाढत्या विषमतेदरम्यान नागरिकांसाठी साधनसामग्री तसेच संधी उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे आम्ही जाणून होतो. संपुआ सरकारने आरोग्य आणि शिक्षण तसेच रोजगार हमी योजना, अन्नसुरक्षा, माहितीचा अधिकार कायदा आणि आधार यासारखे कार्यक्रम राबवत कोटय़वधी लोकांना गरीबीतून बाहेर काढले होते, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे.