देशात महिलावर अन्याय करणारी संस्कृती निर्माण होत असल्याबद्दल केली चिंता व्यक्त
कोल्हापूर प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची क्रांती महिला उन्नती मंचच्या अध्यक्षा सौ. जाहिदा सय्यद यांनी नुकतीच मुंबईत भेट घेऊन त्यांच्या पुढे माहिलांसह शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी शेतकरी चळवळीत क्रियाशील असलेले मुन्ना सय्यदही उपस्थित होते. सय्यद यांनी भारताच्या महिला मल्लांवर झालेला अन्याय, अत्याचार, मणिपूरमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गात वाढत चाललेली असुरक्षिततेची भावना, बिल्किसबानूवर अत्याचार करणाऱ्यांना आरोपींना मिळालेली सूट, शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण, कंत्राटीकरण आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धोरणाविषयी तीव्र नाराजी आणि विरोध प्रकट केला. देशात महिलांवर अन्याय करणारी संस्कृती तयार होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांचा आवाज होऊन लढण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली.