कोल्हापूर प्रतिनिधी
भारताच्या संविधानातील राज्यधोरणाची निर्देशक तत्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगला तऱ्हेने घालवता यावा समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे वृद्धापणामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता कामाचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी राज्य शासनाने राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण 2004 जाहीर केले आहे सदर शासन निर्णयान्वये दिनांक 15 जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस पाळण्यात बाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त श्री विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कार्यशाळा पार पाडण्यात आली याप्रसंगी भारती हॉस्पिटल कोल्हापूर विभागाचे डॉक्टर अभिनंदन मुके यांनी आपले आरोग्य आपल्या हाती याविषयी आजारपणाच्या वेळी वेळीच निदान होणे आजारपण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना याबाबत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले .तसेच ज्येष्ठांसाठी आयुर्वेदाचे महत्व व योगविद्या यासंबंधी माहिती देण्यात आली त योग विद्या आणि ज्येष्ठ नागरिक यांचे आरोग्य याबाबत माहिती देण्यात आली. याप्रसंगी डॉ. अनघा किणी भारती हॉस्पिटल कोल्हापूर यांनी ज्येष्ठांचे आहार व त्याबाबत घ्यावयाची काळजी याची माहिती उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विधिज्ञ श्रीमती डॉ.भाग्यश्री कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिकांना असलेल्या अधिकाराबाबत , कायदे व सल्ला याबाबत माहिती दिली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याबाबत सांगण्यात आले. ज्येष्ठांना कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 व ज्येष्ठ नागरिक अॅक्ट 2007 विषयी माहिती देण्यात आली ज्येष्ठ नागरिकांच्या परिपोषण व निर्वाह भत्ता इ. संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्याबाबत विधी व सेवा प्राधिकरणा च्या मदतीने ज्येष्ठांना न्याय देण्याचे काम या विभागामार्फत चालविली जाते, याचा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उपयोग करून घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांबाबत असणारी हेल्पलाइन 14567 याबाबतही माहिती देण्यात आली.
सदर कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री दिलीप पेटकर, डॉ मानसिंग जगताप, श्रीमती मंगल पाटील, सुनिता कविस्कर, शोभा नाईक, लता कदम ,बाळासाहेब देशमुख ,अशोक कांबळे ,युवराज राजवाडे, सुरेश मारुती कांबळे इत्यादी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री तानाजी पाटील विधी तज्ञ जिल्हा जात पडताळणी कार्यालय कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परब , प्रास्ताविक श्रीमती कल्पना पाटील समाज कल्याण निरीक्षक यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी नीलम गायकवाड सचिन कांबळे सविता शिर्के व कार्यालयाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार सुरेखा डवर यांनी केले.