► प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ परिसरात मागील काही दिवसांमध्ये पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. यामुळे नागरिकांना 500 ते 600 रुपये खर्च करून टँकरद्वारे पाणी खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनगोळ परिसरात सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, पाण्याची गरज वाढली आहे. असे असताना एलअॅण्डटी कंपनीकडून पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येत आहे. बऱ्याच ठिकाणी पाणी गळतीमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे नागरीक हैराण झाले असून, पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मनपा आयुक्त रूद्रेश घाळी यांना निवेदन देण्यात आले.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा
शहरात कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. महानगरपालिकेकडून कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. मोठ्या वयाच्या व्यक्तींसोबतच लहान मुलांवरही कुत्र्यांचे हल्ले होत आहेत. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापौर शोभा सोमनाचे यांच्याकडे केली.