कठोर कारवाईसाठी पाऊल उचला, जिल्हाधिकाऱ्यांची सूचना
► प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा हा एक मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याला लागूनच महाराष्ट्र, गोवा या राज्यांच्या सीमा लागतात. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी वरचेवर होत असते. त्यावर निर्बंध घालण्यासाठी पोलिसांच्याबरोबरच इतर अधिकाऱ्यांनीही पाऊल उचलणे गरजचे आहे. याचबरोबर शहराबरोबर जिल्ह्यामध्ये ज्याठिकाणी अमली पदार्थांची विक्री होते. त्या ठिकाणीही अधिक लक्ष देऊन ती विक्री व तस्करी रोखावी, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अमली पदार्थ विक्री व तस्करी रोखण्याबाबत बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी ही सूचना केली आहे. गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ बेळगाव जिल्ह्यामध्ये तस्करी केली जातात. यापूर्वी अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. या अमली पदार्थांमुळे तऊण बिघडत चालले आहेत. महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी या विळख्यामध्ये गुरफटत चालले आहेत. तेव्हा याबाबत साऱ्यांनीच गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकऱ्यांनी यावेळी सांगितले.
अमली पदार्थांच्या सेवनामुळे अनेक विद्यार्थी व्यसनाधीन बनत आहेत. हा विषय आता गंभीर बनत चालला आहे. सध्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तऊण अडकले जात आहेत. तेव्हा ते रोखण्याचे काम केवळ पोलिसांचे नाही तर इतर अधिकाऱ्यांचेही असून आपले कर्तव्य समजून काम करावे. जेव्हा अशा गोष्टी ज्यांच्या निदर्शनास येतात तेव्हा तातडीने त्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गांज्याची पिके काहीजण घेताना दिसत आहेत. पोलिसांनी धाड टाकून या घटना उघडकीस आणल्या आहेत. असे असले तरी अजूनही याबाबत मोठी मोहीम उघडणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रा. पं. अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे.