“आई-बाबा, मी तुम्हाला काय सांगते आहे, हे तुम्ही समजून घेऊ शकणार नाही, कारण आपल्यात जनरेशन गॅप आहे.’’, अशी वाक्मये आपल्या घरात नव्या पिढीकडून कानावर पडण्यापूर्वी जनरेशन म्हणजे पिढी कशी बदलते आणि वेगवेगळय़ा पिढीतल्या लोकांची वर्तणूक वेगळी का असते हे समजून घेण्याची गरज आहे.
‘अल्फा जनरेशन’ पिढी म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या बालकांपासून सहावीत शिकणाऱया मुला-मुलींच्या हातात मोबाईल लवकर आला. 2010 नंतर जन्मलेल्या त्या बालकाबरोबर काही पालकांनी हॉस्पिटलमधून सेल्फी सोशल मीडीयावर पोस्ट केला असेल. या मुलांचे आई-बाबा या बालकांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला जातात. त्यावेळी ते अजाण बालक रडू नये म्हणून त्याच्या हातात आय-पॅड देतात. हे बालक घरात किरकिर करत असल्यास त्याचे आई-वडील त्याला खेळायला मोबाईल देतात. या बालकाने भरपेट जेवावे यासाठी पालक टीव्हीवर कार्टून सुरु करून देतात. या मुलांना शारीरिक जवळीक म्हणजे कडेवर घेणे, खांद्यावर बसवून फिरायला घेऊन जाणे, लपंडाव खेळणे यापेक्षा एका जागी बसून हातातल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर हालता स्क्रिन असणारी खेळणी जास्त आवडतात. पालकांबरोबर सुसंवाद नसल्यास त्यांचे ऐकणारे, त्यांच्या आवडी-निवडी जाणणारे ‘अलेक्सा’ आणि ‘सिरी’ त्यांना जास्त जवळचे वाटतात. पोस्टाने पत्र पाठविण्यापूर्वी संदेश पाठविण्यासाठी पूर्वी कबुतरे वापरली जायची किंवा एखादा सांगकाम्या घोडय़ावरून पत्र द्यायला जायचा, हे विश्व त्या मुलांच्या कल्पनेपलीकडचे आहे. या मुलांचा Attention span फार कमी असतो, प्रदीर्घ भाषणाने ते फार लवकर ‘बोअर’ होतात. त्यामुळे ‘थोडक्मयात महत्त्वाचे सांगा’ असे म्हणणारी ही पिढी आहे. शहरातील बालकांचे आई-बाबा नोकरी करण्यात व्यग्र असल्यामुळे जर आई-वडिलांना घरी येण्यास उशीर झाला, तर ही मुले आजी-आजोबांबरोबर टीव्हीवर सासवा-सुनांची भांडणे बघतात. त्या कौटुंबिक सिरीयलमधल्या भांडणापेक्षा त्यांना हालत्या चित्राचे जास्त आकर्षण असते. पूर्वीचे आजी-आजोबा गोष्टी सांगायचे हे या बालकांना सांगितले, तर खरे वाटणार नाही. गोष्ट ऐकून काही कल्पना करण्यापेक्षा ‘स्क्रिन’मध्ये डोके खुपसून बसणे त्याना अधिक प्रिय वाटते. इसापनीती किंवा बोधप्रद गोष्टी सांगण्यापेक्षा आजच्या काळाशी सुसंगत गोष्टी सांगणारे आजी-आजोबा या मुलांना प्रिय असतात. गोष्टी सांगितल्यावर त्यातून तुम्ही काय शिकलात, असले बाळबोध प्रश्न विचारणे यांना आवडत नाहीत.
डिजिटल युगात जन्मलेल्या या मुलांना त्यांच्या सोसायटीबाहेर खेळायला जाण्याची मुभा नसते. त्यामुळे यांनी भिन्न आर्थिक स्तरातील मित्र-मैत्रिणी अनुभवलेल्या नसतात. शहरातील तथाकथित ‘इंटरनशनल स्कूल’मध्ये एकमेकांच्या डब्यातील जिन्नस ‘शेअर’ करायला शाळांमध्ये बंदी असते. आपल्याला मिळालेल्या बिस्किटाच्या पुडय़ातील बिस्किटे घरातील सर्वाना किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये वाटून खाणे हे मुलांना शिकवण्याची गरज भासणार आहे, कारण आभासी जीवनात जगणारी ही मुले आपल्याला मिळालेले चॉकलेट किंवा खेळणे दुसऱया कोणाबरोबर वाटून घेण्यास तयार नसतात. या जनरेशनमधल्या मुला-मुलींना बरोबर घेऊन पालकांनी प्रत्यक्ष अनुभव देण्याची गरज आहे. ‘मॉल’मध्ये ही मुले रमतात अशी पालकांची धारणा असली तरीही या मुलांना शेतावर घेऊन जाणे (शेती पर्यटन), आपल्याच घरातल्या कामवाल्या बाईंच्या वस्तीत त्या मुलांबरोबर खेळायला घेऊन जाणे, मैदानी खेळांची ओळख करून देणे, भाजी मंडईमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या बरोबरीने भाज्यांची निवड करणे, वेगवेगळय़ा प्रकारच्या संगीताचे कार्यक्रम-नाटक याचा प्रत्यक्ष अनुभव देणे, असे प्रयोग केल्यास तंत्रज्ञानाला अनुभवाची जोड देऊन या पिढीतल्या मुलांना उत्तम शिक्षण देता येईल.
‘आपल्या आई-वडिलांचे बालपण सोशल मीडियाशिवाय कसे गेले असेल?’ हे या पिढीला पडलेले कोडे आहे. आर्टीफीशियल इंटेलिजन्सची सवय असलेल्या या मुलांना आभासी जीवन आणि खरे जीवन यामधला फरक अनुभवण्याची संधी पालक देऊ शकतात. ‘चॅट-जीपिटी’ सारख्या तंत्राचा वापर व्यापक झाल्यावर या मुलांना कोणत्याही क्लिष्ट विषयावरील निबंध झटक्मयात तयार मिळेल. अशा काळातल्या या पिढीतल्या मुलांना त्यांच्या शालेय जीवनात ज्ञान आणि माहिती यामधला फरक समजावून सांगावा लागेल.
स्वतःच्या ‘मोबाईल किंवा टॅब’ला प्राणापलीकडे जपणारी ही मुले कदाचित काही वर्षांनी वर्गात जाऊन शिकणार नाहीत, ऑफिस काम पूर्णवेळ घरातूनच करतील. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवाला पारखे झालेल्या या मुलांना विविध जाती-धर्म-आर्थिक परिस्थिती-राज्ये-देश यामध्ये राहणाऱया लोकांचे वैविध्यपूर्ण जीवन जवळून बघण्याची संधी पालक देऊ शकतात. शारीरिक आरोग्याइतकेच त्यांनी मानसिक ताणतणावाचा कसा सामना करावा, आनंदी कसे रहावे, मानसिक संतुलन कसे ठेवावे याचे शिक्षण, प्रशिक्षण आणि आधार त्यांना देण्याची जास्त गरज भासू शकते. या पिढीतल्या मुलांवर अधिकार गाजवता येणार नाही, त्यापेक्षा या पिढीच्या तंत्रज्ञान शिकण्याच्या वेगाबरोबर पालकांनी जुळवून घ्यावे आणि त्यांच्याकडून काही गोष्टी खुल्या मनाने शिकून घ्याव्यात. या जनरेशनच्या मुलांची आकलनशक्ती यापूर्वीच्या कोणत्याही पिढीतल्या मुलांपेक्षा अधिक आहे परंतु त्यांचे लक्ष पूर्णपणे नसणे हा पिढीचा मोठा दोष आहे. त्यावर मात करण्यासाठी पालकांनी प्रयत्न केल्यास त्यांच्या मुलांना यशाची शिखरे गाठण्यात कोणी रोखू शकणार नाही. अर्थात यशाची संकल्पना अजून दहा वर्षांनी बदलली असेल, हे सुद्धा तितकेच खरे.
तुमचा मुलगा-मुलगी अल्फा जनरेशनपेक्षा मोठी, ‘जेन झी’ मधली असेल म्हणजेच आता सातवीमध्ये शिकणाऱया मुलांपासून 25 वर्षे वयाच्या युवकांच्या पिढीतला कोणी असेल आणि तुम्हाला मोबाईल/टॅब किंवा कॉम्प्युटर खरेदी करावयाचा असेल तर दुकानातला विपेता त्या मोबाईल-कॉम्प्युटरची वैशिष्टय़े तुम्हाला सांगण्याऐवजी तुमच्याबरोबर असलेल्या ‘जेन झी’ ला सांगेल कारण अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याचे तंत्र त्यांना पटकन समजते. 1997 ते 2010 या कालावधीत जन्म झालेल्या या मुला-मुलींना करियर महत्त्वाचे वाटते परंतु त्याहीपेक्षा पगार किती मिळणार, हे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. ही मुले बी.टी.एस., ब्लॅकपिंक सारखी गाणी ऐकतात ती कदाचित घरातल्या कुणीच ऐकलेली नसतात. त्यामुळे ‘त्यांना शंकर जयकिशन माहित नाही’ यासाठी ज्ये÷ नागरिकांनी उसासे न टाकता नव्या जमान्याचे संगीत त्यांच्या बरोबरीने ऐकल्यास त्या पिढीशी नाळ जुळू शकेल. विलंबित लयीमधले हिंदुस्थानी रागसंगीत त्यांना ‘बोअर’ वाटेल, त्यामुळे द्रुत लयीकडून मध्यलयीतील संगीत ऐकण्याकडे घेऊन जाणे, हा उपाय होऊ शकतो. कोणत्याही कोचिंग क्लासेसला नाव घालण्यापेक्षा अनुभव देण्याची जबाबदारी पालकांना घ्यावी लागेल. ‘75 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले’ अशा गोष्टी ऐकण्यापेक्षा स्वतःची ‘स्पेस’ आवडणाऱया ‘जेन झी’ला वृत्तपत्र वाचण्यापेक्षा मोबाईलवर 60 शब्दात दिल्या जाणाऱया बातम्या वाचणे म्हणजेच थोडक्मयात महत्त्वाचे ‘स्क्रोल’ करणे आवडते. त्यामुळे यांना पालकांनी येता-जाता ‘लेक्चर देणे’ सुरु केल्यास ही मुले घरातून काढता पाय घेतील. वंदनीय गुरु असण्यापेक्षा मैत्री असणारे पालक-गुरु या मुला-मुलींना जास्त जवळचे वाटतात. “मुले मातीचा गोळा असतात आणि आपण त्यांना आकार देतो’’ या अंधश्रद्धेमधून पालकांनी बाहेर पडावे. “तू अजून लहान आहेस’’, “तुला यातले काही समजणार नाही’’, “काय तो आमचा सुवर्णकाळ…’’, “कसली तुमची पिढी’’ अशी वाक्मये यांना उद्देशून उच्चारणे कुटुंब स्वास्थ्यास हानिकारक आहे. 26 ते 41 वर्षे वयाच्या ‘जनरेशन वाय’ आणि 42 ते 57 वर्षे वय असलेल्या ‘जेन एक्स’ पिढीने ‘जेन झी’ बरोबर संवाद साधताना जबाबदारीची कामे त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकून द्यावीत. म्हणजेच मंडईमधून त्यांच्या आवडीच्या चार भाज्या आणायला सांगाव्यात. या मुलांना भाज्यांची यादी दिली, तर तुमचे काम होणार नाही. आपल्या पालकांनी पन्नास वर्षे एकाच व्यक्तीबरोबर कसा काय संसार केला याचे आश्चर्य ‘जनरेशन वाय’ला वाटते. त्यामुळे त्यापुढच्या ‘जेन झी’च्या सहचर्याच्या व्याख्या फारच वेगळय़ा असतील, ज्याबद्दल कदाचित आपण कल्पनाही करू शकणार नाही.
बदलत्या काळाबरोबर प्रत्येक पिढीनुसार पालकत्वाच्या व्याख्या बदलत आहेत, मुल्ये बदलत आहेत, संस्काराच्या व्याख्या बदलत आहेत. पूर्वीचे दिवस सोनेरी असले तरी येणारा सुवर्णकाळही तितकाच महत्त्वाचा आहे. या काळात पालकांना प्रशिक्षण देणाऱया, पालकांचे समुपदेशन करणाऱया नव्या शाळा उघडल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नये.
-सुहास किर्लोस्कर