शेतकरी चिंतेत : अनेक जनावरे गंभीर : रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंगोपनचे प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
तालुक्याच्या काही गावांमधील जनावरांमध्ये लम्पिस्किन (त्वचारोग) आजार झपाटय़ाने वाढला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱयांची झोप उडाली आहे. दरम्यान, बसवन कुडची येथील 3 जनावरे लम्पिस्किनने दगावली आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांमध्ये खळबळ माजली आहे.
अनेक जनावरे या आजाराने गंभीर असल्यामुळे शेतकऱयांची चिंता वाढली आहे. पशुसंगोपन खात्याच्या रॅपिड ऍक्शन पथकाद्वारे बाधित जनावरांवर उपचार केले जात असले तरी सद्यस्थितीत या रोगावर योग्य औषध नाही.
लक्षणांवरून उपचार
तालुक्मयाच्या पूर्व भागातील सांबरा, कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, खनगाव आदी गावांतील जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. शिवाय संसर्गजन्य रोग असल्याने झपाटय़ाने फैलावतो. त्यामुळे कडोली, जाफरवाडी, अलतगा, हंदिगनूर भागातील जनावरांनाही आता लागण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रोगावर अद्याप प्रतिबंधक लस किंवा औषधोपचार नसले तरी पशुसंगोपनच्या पथकाकडून जनावरांच्या लक्षणावरून उपचार केले जात आहेत.
या आजारामुळे जनावरांच्या अंगावर गाठी, फोड येणे आणि त्यानंतर जखम होवून जनावर अशक्त होणे अशी लक्षणे दिसून येतात. विशेषतः गाय, म्हैस, बैलामध्ये हा आजार अधिक दिसून येतो. त्यामुळे जनावरे बाजारात किंवा शर्यतीमध्ये नेऊ नयेत, असे आवाहन खात्याने केले आहे.
पशूसंगोपन खात्याचे आवाहन
बाधित जनावरांपासून डास, माशा चावल्यानंतर इतर जनावरांना या रोगाची लागण होते. शिवाय हा संसर्गजन्य रोग असल्याने इतर जनावरांमध्ये पसरतो. त्यामुळे काही काळातच शेकडो जनावरे या आजाराची शिकार होतात. त्यामुळे शेतकऱयांनी बाधित जनावरे बाहेर चरण्यासाठी, धुण्यासाठी सोडू नयेत, शिवाय बाधित जनावर वेगळे बांधावे, असे आवाहन केले आहे.
पशुसंगोपन खात्याची डोकेदुखी
गतवषीही तालुक्मयातील काही गावांमध्ये या रोगाची लागण झाली होती. दरम्यान, काही दिवसांत हा रोग आटोक्मयात आला होता. यंदा महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात प्रथमतः या रोगाची लागण झाली होती. बेळगाव जिल्हा महाराष्ट्राला लागून असल्याने बाजार आणि शर्यतीतून सीमा हद्दीवरील गावांमध्ये हा रोग झपाटय़ाने वाढला आहे. त्यामुळे पशुसंगोपन खात्याची डोकेदुखी वाढली आहे.
तातडीने उपचाराची शेतकऱयांतून मागणी
लम्पिस्किन हा संसर्गजन्य रोग नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड ऍक्शन पथकाची निर्मिती पशुसंगोपन खात्यामार्फत करण्यात आली आहे. याद्वारे बाधित जनावरांवर घरोघरी जावून उपचार केले जात आहेत. लम्पिस्किन आटोक्मयात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी हा रोग झपाटय़ाने पसरताना दिसत आहे. त्यामुळे पशुसंगोपनने तातडीने उपचार करावेत आणि रोग नियंत्रणात आणावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
अधिकाऱयांकडून गावोगावी जागृती
तालुक्मयात या रोगाने थैमान माजविल्यामुळे दूध उत्पादक पशुपालकांची झोप उडाली आहे. तालुक्मयातील बहुतांशी गावांमधील जनावरे या रोगाची शिकार झाल्याने दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, बाधित जनावर आढळून आल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे.
प्रथमतः पूर्व भागातील काही गावांमधील जनावरांना या रोगाची लागण झाली होती. मात्र, आता पश्चिम उत्तर आणि इतर सर्वत्र या रोगाची जनावरे आढळून येत आहेत. त्यामुळे रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंगोपनला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. दरम्यान, पशुसंगोपन खात्यामार्फत गावोगावी या रोगाबाबत जनजागृती केली जात आहे. शिवाय जनावरांना बाहेर सोडू नका, असे आवाहन केले जात आहे. या संसर्गजन्य आजारावर अद्याप प्रतिबंधक औषध नाही. त्यामुळे या रोगाची अति प्रमाणात लागण झाल्यास जनावरे दगावू शकतात.
दोन दिवसांपूर्वी बसवण कुडची येथील दोन बैल या आजाराने मृत्युमुखी पडले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रोग नियंत्रणासाठी पशुसंगोपनने रॅपिड ऍक्शन पथकाची निर्मिती केली आहे. या माध्यमातून बाधित जनावरावर तातडीने उपचार केले जात आहेत. बाधित जनावरांवर तातडीने उपचार करून घेतले जात नसल्याने धोका निर्माण होत आहे.
प्रत्येक गावात सेवा पुरवा निलजी, सांबरा, मुतगा, बसरीकट्टी, खनगाव, शिंदोळी, कुडची यासह अलतगा, जाफरवाडी, कडोली आदी गावांमध्ये या रोगाची जनावरे आढळून आली आहेत. त्यामुळे शेतकऱयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, खासगी डॉक्टरांकडून उपचार करवून घेतले जात असल्याने शेतकऱयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पशुसंगोपनने प्रत्येक गावात पशुवैद्यकीय सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.