ऐन पावसाळ्यात सांगलीमधील जत तालुक्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जत तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार या मागणी साठी जत तालुक्याच्या सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येऊन आंदोलन छेढण्यात आले. राज्याचे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर जत जालुका दुष्काळी म्हणून जाहीर करा. अशी मागणी करण्यात आली.
जत तालुक्यातील सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी, रिपाईसह व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर आंदोलन छेडले. राज्यशासनाने जत तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी अनेक संघटनेकडून रस्ता रोको करण्यात आला. तसेच विस्तारित म्हैशाळ योजनेचे संपूर्ण टेंडर प्रक्रिया राबवून तातडीने काम सुरू करण्याची मागणीही आंदोलकांकडून करण्यात आली. या प्रमुख मागण्यासह, जनावरांसाठी चारा छावणी किंवा डेपो सुरू करून, म्हैशाळ आवर्तन लवकरात लवकर सुरू करावे, राज्य शासनाने जत शहराचा अमृत योजनेत समाविष्ट करावा असा इतर महत्वपुर्ण मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या.
डोक्यावर ‘दुष्काळ जाहीर करा’ अशा पांढऱ्या टोप्यांसह टी- शर्टवर मागण्याचे लक्षवेधक फलकासह आंदोलकांनी हा रास्ता रोको केला. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार विलासराव जगताप व प्रकाश जमदाडे यांनी केलं. जत तालुक्यातील हजारो शेतकरी, व्यापारी, तरुण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.