रत्नागिरी प्रतिनिधी
जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात चक्रीवादळ स्वरूपात वारे दिसत आहेत. यादरम्यान सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत वादळी वाऱ्यामुळे मोठी हानी झाली.
दक्षिण कोकण, गोवा किनाऱ्यालगत पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस जिल्ह्याच्या किनारपट्टीसह उर्वरित भागात जोरदार पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याचे चित्र आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आज पहाटेपासून जिल्ह्यात जाणवत आहे. काही भागात मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
रत्नागिरीच्या दक्षिण-नैऋत्येस ७० किलोमीटरवर कमी दाबाचा पट्टा
कमी दाबाचा पट्टा प्रतितास २० किलोमीटर वेगाने ईशान्येकडे सरकत आहे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र रत्नागिरीच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ७० किलोमीटरवर, पणजीच्या वायव्येस १२० किलोमीटरवर आणि कर्नाटक येथील होनावरच्या वायव्येस २८० किलोमीटरवर पसरले आहे.
पहाटे पासून सुरू असलेला पाऊस अंदाज सुरू असून नागरिकांनी घरात राहणेच पसंत केले आहे.