सुमारे 5 किमी परीसरात पसरला वणवा; 35 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, धरती कलमे, गवताच्या उटी जळून खाक; गेली तीन वर्षे लागत आहे वणवा; कारण गुलदस्ताच
राजापूर शहर वार्ताहर
राजापूर तालुक्यातील सागवे गोठीवरे परीसरात शनिवारी सकाळी लागलेल्या वणव्यात येथील जवळपास 35 शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या असून सुमारे 30 ते 35 लाख रूपये नुकसान झाले असा अंदाज वर्तवला जात आहे. येथील ग्रामस्थांना काही बागायती वणव्यापासून वाचवल्या. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. वणवा कसा लागला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
शनिवारी सकाळी अंदाजे 10 वा.पासून गोठविरेच्या परसिरात मोठा वणवा लागला होता, हा वणवा गोठीवरे फाटा ते ऐरमवाडीपर्यत सुमारे 5 किमी हा वणवा पसरला असल्याने येथील शेतकऱयांच्या मोठया पमाणात नुकसान झाले आहे. या परीसरातील सुमारे 35 शेतकऱ्यांची धरती असलेली कलमे जळून खाक झाली आहेत. यामुळे सुमारे 30 ते 35 लाख रूपये नुकसान झाले असल्याचा पाथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील काही शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे बागायतींवरच अवलंबून असते. बागायती वणव्यामध्ये जळून गेल्याने त्यांच्या समारे वर्षाभराच्या उदरनिर्वाहाचा पश्न आवासून पुढे उभा राहीला आहे.
शनिवारी सकाळ पासूनच गोठिवरे फाट्या पासून संपूर्ण डाव्या बाजूला आगीने रूद्र रूप धारण केले होते. ही आग तीन चार तास आधीच आग लागली असावी. पुढील दोन तीन तासात आग पाच किलोमीटर दूर वर पसरलेली पाहून लोकांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. परंतु वाऱयाच्या प्रवाहा पुढे सर्व हतबल होत होते. अनेकांच्या हापूस आंब्याच्या झाडांचे आगीत नुकसान झाले. अनेकांच्या, उटी, गवताचे भारे जळुन खाक झाले. आजुबाजुच्या गावातून आगीचे लोट दिसत होते. दुपार नंतर अथक पयत्नाने आग नियंत्रणात आणण्यात गावकऱ्यांना यश आले. आग विझविण्यासाठी गावातील महिला, पुरूषांसहीत मुलांनी आटोकाट पयत्न केला असल्याने या परीसरातील काही बागा त्यांना वाचविण्यात यश आले आहे. शेतकऱ्यांनी रचून ठेवलेल्या वैरणही जळून खाक झाल्या असल्याने जनावरांच्या चारा पश्न उपस्थित झाला आहे.
या वणव्यामध्ये रमाकांत मोंडे, विजय रोकडे, करंजवकर, चंद्रकांत झोरे, निलेश हळदणकर, गितेश बांबरकर, नियाक नार्वेकर, अनंत सोडये यांच्यासहीत सुमारे 35 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लागलेला वणवा विझविण्यासाठी जगदिश रोकडे, तुकाराम ऐरम, रमाकांत मोंडेसह त्यांच्या बागेतील सर्व कामगार, अमर शिंदे, सुधाकर रोकडे यांच्यासहीत सर्व ग्रामस्थांनी पयत्न केले. गेली तीन वर्षे सतत या परीसता वणवा लागत असून हा वणवा का लागला जात आहे याचे कारण अद्याप समजू शकले नाही. रविवारी सांयकाळपर्यत पंचनाम करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत होते.