डोंगर कटाई, मातीचा भराव कामासाठी प्रशासन लवकरच निर्णय घेणार
चिपळूण प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणासाठी माथ्यावरील डोंगर कटाईसह मातीच्या भरावाच्या कामासाठी घाटातील वाहतूक पुन्हा बंद करण्याचा विचार सुरू झाला आहे. प्रशासन या बाबतचा निर्णय लवकरच घेईल, अशी शक्यता महामार्गाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणासाठी गेले वर्षभर काम सुरु आहे. घाटात डोंगर कापताना यापूर्वी अपघात घडल्याने महिनाभर घाटातील वाहतूक बंद ठेवून कामे करण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात पोखरलेले डोंगर खचल्याने अतिवृष्टीत घाट पुन्हा बंद ठेवावा लागला. परिणामी अवजड वाहतूक बंद ठेवून ती कळंबस्ते, आंबडस, चिरणीमार्गे लोटेकडे वळवण्यात आली. अर्धवट स्थितीत असलेला हा घाट पावसाळ्dयात दरडी खाली आल्याने या घाटातील वाहतूक जवळपास महिनाभराहून अधिकाळ बंद ठेवण्यात आली. मात्र आता पुन्हा घाटातील काम सुरू होत आहे. धोकादायक स्थितीत असलेले डोंगर कापण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याने घाटातील वाहतुकीला त्याचा कोणताही फटका बसू नये, या दृष्टीने तसेच या घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी घाटातील वाहतूक काही ा†दवस बंद ठेवावी लागणार आहे. दरम्यान, या बाबत अधिकृत निर्णय झालेला नसला तरी त्या दृष्टीने प्रशासन नियोजन करीत आहे. या बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून नंतरच त्या बाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसे झाले तर परिणामी पर्यायी वाहतूक नेहमीप्रमाणे लोटे-ा†चरणी-कळबस्ते मार्गाने वळवण्यात येईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.