स्वाभिमाऩी शेतकऱी संघटनेमध्ये कोणताही वाद नाही. संघटनेची येत्या काही दिवसात बैठक असून त्यामध्ये रविकांत तुपकर आणि प्रशांत डिक्कर यांना बोलवून त्यांच्यातील एकमेकांबद्दल जी काही नाराजी आहे ती दुर केली जाईल आणि पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.
पहा VIDEO : रविकांत तुपकरच्या नाराजीवर राजू शेट्टींचा खुलासा
शेतकऱी संघटनेचे बुलढाणा जिल्ह्यातील नेते रविकांत तुपकर आणि प्रशांत डिक्कर यांच्यात वादाची किनार निर्माण झाली आहे. तसेच रविकांत तुपकर यांनी पक्षाच्या जेष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना पाठबळ दिले जात नसल्याचा आरोप राजू शेट्टींवर केला आहे.
‘स्वाभिमानी’मध्ये संघर्ष अटळ! नेर्तृत्वाच्या भुमिकेवर आणि कार्यपद्धतीवर माझा आक्षेप- रविकांत तुपकर
आपला एक व्हिडीओ जारी करून राजू शेट्टी म्हणाले, “स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये वाद असल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत. त्यात काही तथ्य नाही. काही बारिकसारिक कुरबुऱ्या पदाधिकाऱ्यामध्ये नेहमीच असतात. तशाच प्रकारचा वाद बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्य़े आहे. परंतु तो इतका महत्वाचा आहे अस मला वाटत नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “रविकांत तुपकरांची काही नाराजी असेल तर त्यांनी आपले म्हणणे मांडावं यासाठी पक्षाच्या शिस्तपालन समितीने बोलावलं आहे. येत्या 8 ते 10 तारखेच्या दरम्यान राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महत्वाचे नेते यांची बैठक होणार आहे. या बैठकीला रविंद्र तुपकर आणि विदर्भ युवा आघाडीचे प्रशांत डिक्कर यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी त्यांनाही बोलावण्यात आले आहे. या बैठकीत काही समज गैरसमज असतील तर ते संपून जातील आणि हे पेल्यातील वादळ पेल्यातच संपून जाईल” असेही ते म्हणाले.