1 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी, आठवी उत्तीर्णांनाही संधी ः अधिसूचना-मार्गदर्शक तत्त्वे जारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी लष्कराने सोमवारी अधिसूचना जारी केली. अग्निवीरांच्या भरतीसाठी 1 जुलैपासून नोंदणी सुरू होणार आहे. अधिसूचनेनुसार, आठवी आणि दहावी उत्तीर्ण युवक यामध्ये अर्ज करू शकतात. अधिसूचनेत पात्रता, अटी, भरतीप्रक्रिया, वेतन आणि सेवा नियमांचे भत्ते यांचा तपशील सविस्तरपणे देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन नोंदणीसाठी joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. अग्निपथ योजनेंतर्गत ही भरती चार वर्षांसाठी केली जाणार असून सर्व पदांवर नियुक्तीसाठी वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 23 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
सैन्य भरतीसाठी केंद्र सरकार अग्निपथ योजनेवर ठाम आहे. आता भारतीय लष्करात अग्निपथ योजनेनुसार आजपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एका बाजूला अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना दुसरीकडे आता भरती प्रक्रियेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या अग्निवीर भरतीसाठी दोन वर्षांची अट शिथिल करण्यात आली आहे. मागील दोन वषी सैन्य भरती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्करापाठोपाठ भारतीय हवाई दल आणि नौदलातील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. नौदलातील अग्निवीर भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन मंगळवार दि. 21 जून रोजी निघणार असून वायुदलातील भरती प्रक्रिया 24 जूनला सुरू होणार आहे. भारतीय हवाई दलातील अग्निवीर भरतीच्या या तुकडीसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा 24 जुलैपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
या श्रेणींमध्ये भरती
अधिसूचनेनुसार, लष्कर भरतीसाठी जुलैपासून नोंदणी करता येईल. अग्निवीरांना सैन्यात वेगळे पद असेल, असे लष्कराने स्पष्ट केले. ते कोणत्याही विद्यमान रँकसह असणार नाही. वेगवेगळय़ा पाच श्रेणींमध्ये (ग्रेड) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हय़ा श्रेणी अग्निवीर जनरल (सामान्य) डय़ुटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक, अग्निवीर टेड्समन (10वी पास), अग्निवीर टेड्समन (8वी पास) अशापद्धतीने असणार आहेत.
श्रेणीनुसार शैक्षणिक पात्रताही जाहीर
@ सामान्य (जनरल) पदांच्या भरतीसाठी उमेदवार किमान 45 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा.
@ तांत्रिक विमानोड्डाण आणि दारुगोळा (एव्हिएशन अँड ऍम्युनेशन) पदांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीमध्ये 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
@ लिपिक/स्टोअरकीपर पदांसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून किमान 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असावा. तसेच इंग्रजी आणि गणितात 50 टक्के गुण असणे आवश्यक आहेत.
@ टेड्समनच्या पदांसाठी स्वतंत्रपणे दहावी आणि आठवी उत्तीर्णांची भरती केली जाईल.
एनसीसी प्रमाणपत्र असलेल्यांना बोनस गुण
सैन्यात भरतीसाठी एनसीसी-ए प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 5 गुण, एनसीसी-बी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 10 गुण आणि एनसीसी-सी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 15 गुण अधिकचे देण्यात येणार आहेत. एनसीसी-सी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अग्निवीर जनरल डय़ुटी आणि लिपिक/स्टोअरकीपर पदांसाठी सीईई (सामान्य प्रवेश परीक्षा) मधूनही सूट मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
चालू वर्षात 25,000 अग्निवीरांची भरती
चालूवषी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लष्करात 25,000 अग्निवीरांची पहिली तुकडी दाखल होणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱयांनी दिली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 पर्यंत दुसऱया तुकडीत या प्रशिक्षणार्थींची भरती पूर्ण करून ही संख्या 40,000 करण्यात येणार आहे. आगामी 4 ते 5 वर्षात अग्निवीरांची संख्या 50 ते 60 हजार आणि त्यानंतर एक लाख इतकी करण्यात येणार आहे.