कदंब महामंडळाची सत्तरी तालुक्यातील पंचायतींना सूचना : अन्यथा ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्याचा इशारा
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील ग्रामीण भागात आज ठिकठिकणी कदंबची बससेवा सुरू आहे. यामुळे नोकदारवर्ग, विद्यार्थी तसेच बाजारहाट किंवा अन्य काही कामांसाठी बाहेर जाणाऱया नागरिकांच्या सुरळीत प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे. मात्र सध्या अनेक गावांमध्ये रस्त्यावर विविध अडथळे निर्माण झालेले आहे. कदंब वाहतुकीत अडचणी येत आहे. शिवाय हा प्रकार धोकादायकही आहे. त्यामुळे संबंधित पंचायतींनी सदर अडथळे दूर करावे. अन्यथा तेथील बस फेऱया बंद कराव्या लागतील, अशी सूचना वजा इशारा कदंब महामंडळाने संबंधित पंचायतींनी दिला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा झाडे झुडपे वाढू लागल्यामुळे झाडांच्या फांद्या रस्त्यावर लोंबकळतात, यामुळे बसला नुकसानी पोहोचते. तसेच काही नागरिकांकडून रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवले जाते. यामुळे बस वाहतुकीला समस्या निर्माण होते. यामुळे चालक कंटाळतात. ग्रामीण भागात बस घेऊन जाण्याबाबत नाराजी व्यक्त करतात.
नुकसानीला चालक ठरतो जबाबदार
रस्त्यावर लोंबकळणाऱया झाडांमुळे अनेकवेळा बसच्या दर्शनी भागाच्या काचा फुटून नुकसान होते. यामध्ये व्यवस्थापन कंदबा बसेसच्या चालकाला जबाबदार धरते. त्यांच्या पगारातून नुकसानीची रक्कम वजा केली जाते. यामुळे चालकांमध्ये नाराजी आहे.
अडथळे दूर करा, अन्यथा ग्रामीण भागात जाणार नाही!
रस्त्यावर असलेले अडथळय़ांमुळे आपल्याला मनस्ताप होतो, अशी प्रतिक्रिया अनेक कदंब चालकांनी व्यक्त केली. बऱयाचवेळी महामंडळ व्यवस्थापन चालकालाच जबाबदार धरून त्याच्या पगारातून ही रक्कम वजा केली जाते. यामुळे आता ग्रामीण भागातील रस्त्यावर असलेल्या अडचणी दूर होत नाहीत, तोपर्यंत सदर गावांमध्ये जाणार नसल्याचे चालकांनी व्यवस्थापनासमोर स्पष्ट केले आहे. यामुळे आता व्यवस्थापनासमोर मोठय़ा अडचणी निर्माण झालेले आहेत.
व्यवस्थापनाने पंचायतीला केल्या विनंती
या संदर्भात सत्तरी तालुक्मयातील अनेक पंचायतीशी व्यवस्थापनाने संपर्क साधला असून रस्त्यावरील अडथळे त्वरित दूर करण्याची विनंती केली आहे. रस्त्यावर डोंबळणाऱया झाडाच्या फांद्या, रस्त्याच्या बाजूला डंप करून ठेवलेले बांधकाम साहित्य त्वरित हटवा अन्यथा आम्हाला नाईलाजाने कदंबा बससेवा ग्रामीण भागामध्ये बंद करावी लागेल, अशा प्रकारचा इशारा व्यवस्थापनाने प्रत्येक पंचायतीला दिलेला आहे.
भिंरोडा पंचायतीने घेतली दखल
भिंरोडा पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे यांनी गेल्या आठ दिवसांपासून रस्त्याबाजूची झाडेझुडपे व लोंबकळणाऱया फांद्या यांचे अडथळे दूर करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर बांधकाम साहित्याची बस वाहतुकीला अडचणी होणार नाही, याची दखल नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन संदर्भात सरपंच राणे यांनी केले.