प्रतिनिधी /बेळगाव
कृषिप्रधान भारतामध्ये शिक्षित तऊणांनी शेतीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. या क्षेत्राकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहिल्यास रोजगार निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन उद्योजिका जोत्स्ना पै यांनी केले.
एसकेई सोसायटी संचालित राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रेडक्रॉस विंगतर्फे आयोजित राईस फेस्टिव्हलमध्ये त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आरपीडी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समिती सदस्या बिंबा नाडकर्णी होत्या. प्रगतशील शेतकरी नागराज देसाई यांनी आधुनिक शेतीच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. प्रगतशील शेतकरी शंकर लंगोटी यांनी रासायनिक शेतीच्या दोषांविषयी माहिती दिली. प्राचार्या अनुजा नाईक यांनी आधुनिक शेती वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडली.
डॉ. अभय पाटील व रेडक्रॉस विंगच्या प्रोग्राम ऑफिसर डॉ. सुनंदा कित्तली यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. डॉ. शर्मिला संभाजी यांनी प्रास्ताविक केले. एच. जे. शिवाली यांनी सूत्रसंचालन केले. नुपूर रानडे हिने आभार मानले. यावेळी कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व रेडक्रॉस विंगचे सदस्य उपस्थित होते.