आळते वार्ताहर
मागील महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.त्यापार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील बोरगाव गावातील गावकऱ्यांनी घेतला असून गावात सर्वपक्षीय मंत्री, खासदार, आमदार व राजकीय पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला असून तशा प्रकारचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
सकल मराठा समाजाच्यावतीने चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाही असे फलक लावले आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. तो संपल्याने आता जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. अनेक गावात अनेक गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आलीय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बोरगाव गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली. गाव बंदीचा फलक देखील गावात लावण्यात आला. त्यासोबत गावकऱ्यांनी नेत्यांना गावात येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.