सांगली : प्रतिनिधी
जालना मध्ये सराटी या गावामध्ये मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत आमरण उपोषण बसले आहेत त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी व त्या ठिकाणी झालेल्या आमनुष्य लाठी चार्ज हल्ल्याच्या चौकशी होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा म्हणून महात्मा गांधी पुतळा जवळ स्टेशन चौक सांगली या ठिकाणी राज्य प्रवक्ते संतोष पाटील हे बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा देत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण चालूच राहील असा इशारा उपोषण करते संतोष पाटील यांनी केला आहे.
यावेळी मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू साळुंखे,शहराध्यक्ष सुधीर चव्हाण,शिवसेनेचे पंडितराव बोराडे राष्ट्रवादीचे प्रकाश बापू सूर्यवंशी,नगरसेवक लक्ष्मण नवलाई,आर बी पाटील स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन शिंदे, सरचिटणीस अनमोल पाटील, सराफ कट्टा ग्रुपचे सर्व सदस्य रमेश अण्णा चव्हाण,सुधाकर नार्वेकर,चंद्रकांत मालवणकर, रणजीत भैय्या चव्हाण, पंडित पाटील, खुदबुद्दीन मुजावर,एम के कोळेकर, नंदकुमार सुर्वे, मनोज कांबळे, सतीश जाधव,सतीश पाटील, सुनील दळवी, शंकरराव मोहिते, तुषार वळीव, संदीप पवार, अधिकारी उपस्थित राहून उपोषणास पाठिंबा दिला.