ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मिंधे गट आधी बाप पळवत होता, आता मुलं पळवत आहे. पण मिंधे गटाची ही भरती कुचकामी आहे, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सुभाष देसाई हे ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या पुत्राने मिंधे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला फरक पडणार नाही. मिंधे गट आधी बाप पळवत होता. आता मुलं पळवत आहे. ही भरती कुचकामी आहे.
अधिक वाचा : संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना होऊ शकते विनावॉरंट अटक
उदय सामंत हे मिंधे गटात आहेत. त्यांनी देसाईंच्या मुलावर आरोप करत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, मिंधे गटाने भाजपकडे असलेल्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांना स्वच्छ केले. भाजपच्या या वॉशिंगमशीनचा आमच्यावर मात्र कोणताही परिणाम होणार नाही, असेही राऊत म्हणाले.