प्रतिनिधी / बेळगाव : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईचा भडका उडत आहे. आता अन्न धान्यावर जीएसटी लावून संपूर्ण देशातील गोरगरीब जनतेला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला आहे. त्या विरोधात आता विविध संघटना आंदोलन करत आहेत. बुधवारी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
अच्छे दिन आनेवाले हे असं सांगून मोदी सरकारने साऱ्या जनतेला बुरे दिन दिले आहेत. आता आम्हाला अच्छे दिन नको बुरे दिनच पाहिजेत, असे म्हणत केंद्र सरकारचा जाहीर निषेध नोंदविला आहे. यावेळी एसडीपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.