उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ यांचे मत
काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ हे बेळगाव उत्तर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याशी केलेली खास बातचीत…
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर उत्तर मतदारसंघात काय विकास कराल?
बेळगावचा विकास करण्यासाठी फक्त परिश्र्रमच नाही तर विल पॉवरदेखील पाहिजे. काम करण्याची इच्छा हवी. आमचे बंधू फिरोझ सेठ यांनी बेळगाव शहराची वाढती लोकसंख्या पाहून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उपक्रम राबविले होते. दर दिवशी 2.5 कोटी लिटर पाणी फिल्टर होण्याचे प्रकल्प आणले होते. त्याची क्षमता 8 कोटीपर्यंत वाढविण्याची इच्छा आहे. बेघरांसाठी 5000 घरे फिरोझ सेठ यांनी मंजूर केली होती. त्याचपद्धतीने 20 हजार घरे बांधण्यात येतील. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना मासिक 2000 ऊ. देण्यात येतील. गृहज्योती योजनेंतर्गत 200 युनिट वीज मोफत देण्यात येईल. मासिक 10 किलो तांदूळ देण्यात येतील. महिलांना मोफत प्रवास, पदवीधरांना 3000 ऊपये आणि डिप्लोमाधारकांना 1500 ऊपयांची मदत 2 वर्षांपर्यंत देण्यात येईल. कर्नाटक राज्यात 2 लाख 50 हजार सरकारी पदे रिक्त असून त्या पदांवर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
बेळगाव उत्तर मतदारसंघात मराठा, मुस्लीम असे विभिन्न जाती-धर्माचे लोक असून त्यांचा प्रतिसाद कसा आहे?
सर्व जाती-धर्माच्या लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लहानपणापासून सर्व समाजातील लोकांशी सलोख्याने वागत आलो आहे. त्यामुळे राजकारणात व्यक्ती महत्त्वाची असते, जात आणि धर्म नाही.
रोजगार-व्यवसाय वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहात?
कोरोनाकाळात बेळगाव जिह्यावर ओढवलेली परिस्थिती पाहता आपण जनतेला आरोग्यसेवा पुरविली आहे. बेळगाव जिल्हा ऊग्णालयातील डॉक्टर्स चांगले आहेत. या ऊग्णालयात योग्य सुविधा पुरविल्या तर ऊग्णांना चांगल्या आरोग्य सेवा मिळू शकतील. निवारा, आरोग्य, शिक्षण हाच आमचा मूलमंत्र आहे.
उत्तर मतदारसंघात 40 टक्के मुस्लीम आणि 60 टक्के हिंदू लोकसंख्या आहे, त्यांचा विश्वास कसा संपादन कराल?
जाती-धर्माचा भेदभाव आमच्यात नाही. माझ्या क्षेत्रात सर्व जाती-धर्माच्या लोकांमधून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मानव ही एकच जात आहे. त्यामुळे या मानव जातीचा कसा विकास करता येईल याकडे लक्ष द्या. जात आणि धर्माला राजकारणात आणि विकासकामात आणू नये.
उत्तर मतदारसंघात तुमचे बंधू फिरोझ सेठ दोन वेळा आमदार होते. आपण याच मतदारसंघात उमेदवार आहात, जनतेचा पाठिंबा कसा आहे?
फिरोझ सेठ यांनीच या मतदारसंघातील अनेक समस्या सोडविल्या आहेत, हे जेव्हा लोकांच्या तोंडून ऐकायला मिळते, तेव्हा खूप समाधान वाटते. आजही फिरोझ सेठ यांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रेम, आदर पाहून फिरोज सेठ यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. सीमाभागातदेखील विकास करण्यात आला आहे. कमिशन किंवा पैशासाठी काम करणार असाल तर कृपा करून राजकारणात येऊ नये. आपण समाजसेवक असून सरकारची साथ घेऊन जनतेची सेवा करण्याचा उद्देश मनात ठेवा.
यंदाच्या निवडणुकीत सर्व पक्षांतून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाला सुऊवातीपासून राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यादृष्टीने आपण या निवडणुकीकडे कसे पाहता?
मी एक व्यावसायिक आहे आणि त्यासोबतच समाजसेवा करत आहे. 2008 साली पक्षाने आपल्याला निवडणूक लढविण्याची संधी दिली. संविधानावर विश्वास ठेवतो, आणि संविधानासमोर सर्व समान आहेत.
फिरोझ सेठ यांची ‘मिस्टर डेव्हलपमेंट’ अशी ओळख होती. तुम्ही पण ही ओळख मिळवू शकाल का?
बेळगाव शहराचा विकास प्रामाणिकपणे करण्याचा मंत्र आणि आदर्श त्यांनी मला दिला आहे. जनतेने आजदेखील फिरोझ सेठ यांच्या कामाची आठवण ठेवली आहे. जनतेचे अश्रू पुसण्याचे काम करा. कोणाच्याही समोर हात पसरू नका. ज्या दिवशी माझ्यावर 10 पैसेही कमिशन घेतल्याचा आरोप करण्यात येईल तेव्हा मी माझ्या पदाचा राजानामा देऊन राजकीय संन्यास घेईन. नि:स्वार्थ सेवा हेच आमच्या परिवाराचे ध्येय आहे.