कोल्हापूर : संतोष पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जनतेच्या दरबारात जाण्याचा निर्णय घेतला. नाशिक, बीड नंतर कोल्हापुरात पवार नावाचा झंझावात शुक्रवारी घोंघावणार आहे. अगदी एक दोन मात्र गर्भित वाक्यात समोरच्याला गारद करण्याची वकुब असलेल्या पवारांच्या रडारवर केंद्र आणि राज्य सरकारसह जिह्यातील त्यांना सोडून गेलेले नेते असणार, यात शंका नाही. शरदअस्त्राने होणारी जखम सांगताही येणार नाही अन् सोसणार नाही, अशी अवस्था संबंधितांची होईल. पितृस्थानी म्हणून पुजलेल्या शरद पवार यांच्यावर पलटवार करणे अशक्य असल्याने शरदअस्त्राची भळभळती जखम घेवूनच ‘त्या‘ नेत्यांना पुढील राजकीय वाटचाल करावी लागेल.
नाशिक येथील सभेत छगन भुजबळ यांची गोची केली. आता कोल्हापुरातील सभेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत शरद पवारच बोलतील असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन दिवसापूर्वीच स्पष्ट केले होते. याअर्थाने कोल्हापूर आणि राज्यातील राजकीय जाणकारांचे यासभेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन-चार नव्हे; तर अडीच-पावणेतीन डझन आमदारांनी ‘दगा‘ देऊन भाजपसोबत ‘घरोबा‘ केल्यावरही न डगमगलेले या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आता पक्ष उभारण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आठवड्याला दोन जिल्हे फिरून पवार हे 12-15 विधानसभा मतदारसंघांत जाणार आहेत. फुटलेल्यांना निवडणुकीत गारद करण्याच्या हेतुने पवार जुन्या-जाणत्यांच्या भेटी घेऊन नवे राजकारण घडविणार असल्याचेही समजते. ऐन पावसाळ्यात निघण्राया पवारांच्या द्रौयाकडे स्राया राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. त्याचवेळी राज्यभर फिरताना पवारांच्या रडारवर कोण असतील याचेही संकेत मिळत आहेत. नाशिक येथील पहिल्या सभेत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट हल्लाबोल केला. नाशिकमध्ये तुमची माफी मागायला आलोय, भुजबळांबद्दलचा अंदाज चुकला म्हणत शरद पवारांची येवल्यात जोरदार बॅटींग केली होती. आपल्या वाढत्या वयाचा दाखला दिला तर महागात पडेल असा इशारा दिला.
त्यानंतर बीड येथील सभेत मंत्री धनंजय मुंडे यांना सपशेल बेदखल केले. ‘हे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. आता चुकीच्या लोकांना आवरण्याची वेळ आली आहे.‘, असे म्हणत शरद पवारांनी सरकारवर टीका केली. तसंच, ‘माझं वय झालं म्हणण्रायांनी थोडी माणुसकी दाखवायला शिका‘, असा टोला त्यांनी बंडखोरांना लगावला. पवारांनी टीका केली तरी तो चर्चेचा विषय होतो. आणि दुर्लक्षित केले तरी त्याचे अनेकांगी राजकीय कंगोरे उमठत असल्याचा इतिहास आहे. अजित पवार यांच्या बंडाने कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला एकसंघ राहिला नाही. मंत्री हसन मुश्रीफ आणि आ. राजेश पाटील यांच्यासह बहुसंख्य नेते अजित पवार यांच्या छावणीत दाखल झाले आहेत. जिह्यात राष्ट्रवादीची नव्याने फेरमांडणीचे आव्हान मोठ्या पवारांपुढे आहे. श्रीमंत शाहू छत्रपती हे शरद पवार यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. पवार यांचा हा दौरा जिह्याचे राजकारण ढवळून काढणार ठरु शकतो. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शरद पवार यांची सभा भविष्यातील राजकारणाला दिशा देणारी ठरणार आहे.
कोल्हापूर जिह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जिल्हा एकसंघपणे पवारांच्या पाठीशी कधी राहिला नसला तरी जिह्यातील दहा विधानसभा आणि दोन लोकसभा मतदार संघातील निकालाचे काटे फिरवण्याची ताकद शरद पवार यांच्यात होती. ती राजकीय ताकद दुभंगली की त्यात सहानूभीमुळे वाढ झाली. इंडीया आघाडीच्या नव्या प्रयोगाने अजून बळकट झाली हे येणारा काळ ठरवेल. मात्र, पवारांचे कोल्हापूर जिह्यावर गारुड कोणीही नाकारु शकत नाही. पवारांच्या एका वक्तव्यावर येथील निवडणुकांचा रंग बदलेला आहे. 2004 आणि 2009च्या लोकसभा निडणुकीत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रचारार्थ व विरोधात सभा घेऊन न्ही वेळेला मंडलिकांच्या विजयास कारणीभूत ठरलेल्या शरद पवार यांच्या क्तव्यांची आजही कोल्हापुरात चर्चा आहे. पवार आणि कोल्हापूर चि जिव्हाळ्याचे असलेले नाते आता ‘स्वाभिमाना‘च्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. अशा तावरणात पवारांच्या या सभेबाबत कोल्हापुरात कमालीची उत्सुकता नवीन नाही.
शिवसेनेतर्फे धनंजय महाडिक राष्ट्रवादीतर्फे सदाशिवराव डलिक यांच्यात झालेली 2004ची लोकसभा निवडणुकीत शेवटच्या घटकेपर्यंत उत्कंठावर्धक ठरली होती. निवडणूक प्रचारार्थ बिंदू चौकात झालेल्या सभेत शरद पवार यांनी ‘कौन है मुन्ना… कहा से आया‘ असे खोचक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. निव्वळ शरद पवार यांच्या वक्तव्याने निवडणुकीचा दोलक उलट्या दिशेने फिरल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यानंतरच्या पाच वर्षांत पंचगंगेतून बरेच पाणी वाहून गेले. शरद पवार व खासदार मंडलिक यांचे संबंध तुटेपर्यंत ताणले. स्वाभिमानाला चेतावत सदाशिवराव मंडलिक यांनी थेट पवारांविरोधा श•t ठोकला. संभाजीराजे छत्रपत यांच्या विरोधात अपक्ष म्हणू निवडणूक रिंगणात उतरले. बिंदू चौकात 2009मध्ये पुन्हा शरद पवार यांची सभा झाली. यावेळी सदाशिवराव मंडलिक यांचा उल्लेख ‘म्हातारा बैल‘ असा पवारांन केला. दोन्हीवेळची पवारांच वक्तव्य मंडलिक यांच्यासाठी तारक ठरली होती. यानिवडणुकीतील पराभावानंतर प्रतिक्रिया देताना, लोकसभ निवडणुकीत माझी ‘गंमत‘ केली गंमत करण्रायांना विधानसभेच्य निवडणुकीत दाखवू, असे सूच विधान शरद पवारांनी केले अन् खरेही करून दाखविले होते. या कोल्हापुरच्या सभेत शरद पवार काय बोलण याबाबत कमालीची उत्सुकत लागून राहिली आहे.
पलटवार करुच शकत नाहीत..!
अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे नेते काल आणि आजही शरद पवार यांना वडीलध्रायाप्रमाणे मान देतात. शरद पवार यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर देण्याचे धाडस अजित पवार गटातील एकही नेत्याने केलेले नाही. पवार यांच्या टीकेला उत्तर देणे म्हणजे अजून राजकीय दृष्ट्या खोलात जाण्यासारखे आहे. राष्ट्रवादीतील हे बंडखोर नेते शरद पवार यांच्या पाठींब्यानेच राजकीय क्षीतिजावर चमकले आहेत. त्यामुळे मोठ्या पवारांची टीका सहन करुन त्याचे राजकीय प्रतिध्वनी कमीत कमी उठतील यासाठीच संबंधितांचा प्रयत्न राहणार आहे. एरवी दुस्रया एखाद्या नेत्यांची सभा झाली अन् त्यामध्ये झालेल्या आरोपांचे आणि टीकेला तत्काळ उत्तर देण्याची तसदी घेतली जाते. मात्र यावेळी शरद पवार यांची सभा त्यास अपवाद ठरणारी असेल.