अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर ऱाष्ट्रवादी आता दोन भागात विभागला आहे. त्यानंर झालेल्या राजकिय घडोमोडीनंतर अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. त्यानंतर आता शरद पवार यांनी कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी तसेच पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरु असून येत्या 25 ऑगस्ट रोजी त्यांची कोल्हापूरात सभा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांनी जनतेला भावनिक साद घालण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. गेल्या काही दिवसात राजकिय घडामोडीच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांमधील संभ्रम दुर करण्याबरोबरच राष्ट्रवादीची नव्याने बांधणी करणे अशा दुहेरी पातळ्यावर शरद पवार अॅक्टीव झाल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार असून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असणार सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महारांजांच्या समाधीला शरद पवार वंदन करणार असून त्यानंतर शहरात भव्य मोटरसायकल रॅली निघणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थित राहणार असून कोल्हापूरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शरद पवार गट यासाठी कामाला लागला आहे.
राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांच्या जिल्ह्यांमध्य़े कोल्हापूर हा एक महत्वाचा जिल्हा मानला जातो. एकेकाळचे शरद पवारांचे निष्ठावान आणि सध्याचे अजित पवारांचे निष्ठावान असलेल्या राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बरोबर ही जिल्हातील मह्त्वाचे नेतेही अजित पवारांबरोबर गेल्याने एकाकी पडलेल्या शरद पवार गटाला उर्जा देण्यासाठी शरद पवार हे येत्या 25 तारखेदरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.