जातीय सलोखा आणि एकोपा राहावा यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आम्ही सुद्धा हिंदुत्ववादी आहोत पण आमचं हिंदुत्व वेगळ्या पद्धतीने असल्याचा खुलासा शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापूरातील शाहू महाराजांच्या समाधिस्थळाजवळ आयोजित शिव- शाहू सामाजिक एकोपा कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, गेले पंधरा दिवस कोल्हापूर जे वातावरण झाले आहे. त्यासाठी सामाजिक एकोपासाठी चर्चा होणे महत्वाचे होते. त्या पार्श्वभुमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही सुद्धा हिंदु असून आमचे हिंदुत्व हिंदुत्ववादी लोकांपेक्षा वेगळ आहे असे ते म्हणाले.
पहा video >>> आम्हीसुद्धा हिंदु…पण आमचे हिंदुत्व वेगळ्या पद्धतीचं- छत्रपती शाहू महाराज
माजी आमदार मालोजी छत्रपती बोलताना म्हणाले, “कोल्हापूराक चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याला पायबंद घातला गेला पाहिजे. यासाठी प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तींनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. कोल्हापुरात सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने आणि सलोख्याने राहत आहेत अशा परिस्थितीत दंगल होणे योग्य नाही.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आमदार पी एन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना “कोल्हापुरात जातील दंगल कधी घडली नाही. पण ती घडली हे खुपच दुर्दैवी आहे. कोल्हापूरची घटना प्लॅनिंग करून घडली का हे तपासले पाहिजे” असेही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपले विचार माध्यमांसमोर मांडताना म्हणाले “कोल्हापुरात काही मंडळी शाहू महाराज यांचा विचार दुबळे करायला निघाले आहेत. आम्ही शाहू महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहोत आम्ही ते जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला आशा कार्यक्रमाचे आयोजन होत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने देशात एक वेगळा संदेश जाईल.शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला आशा कार्यक्रम होत आहेत, या यात्रेच्या निमित्ताने देशात एक वेगळा संदेश जाईल.” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर दक्षिण चे आनदार ऋतुराज पाटील यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. ते म्हणाले, “कोल्हापूरात धार्मिक तेढ निर्माण होणे योग्य नाही. आज आम्ही कोल्हापूरकर म्हणून एकत्र आलो आहोत.” असो ते म्हणाले.