प्रतिनिधी / बेळगाव : शिवाजी विद्यापीठाला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त सीमाभागातील 865 गावांतील विध्यार्थ्यांना मोफत आणि सवलतीच्या दरात विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे. विद्यापीठाने ही महत्वकांक्षी योजना राबविली असून सीमाभागातील होतकरू विध्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र प्रमुख डॉ. भारती पाटील यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील विध्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन शिबिर मंगळवारी खानापूर रोड येथील संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनमध्ये येथे पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.