कुडाळ प्रतिनिधी
राज्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांवर सत्तर वर्षापर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने वीस हजार रुपयांच्या मानधनावर तातडीने नियुक्त करण्यात यावे या महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकाच्या विरोधात मंगळवारी सायंकाळी कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीने तीव्र निदर्शने करीत या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक गरीब कष्टकरी आणि शेतकऱ्याच्या मुलांनी कर्जबाजारी होऊन डीएड आणि बीएड केले. परंतु शासन त्यांची नियुक्ती करण्याचं सोडून निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्याचा घाट घालत आहेत. खरं म्हणजे शासनाचे हे गणित आमच्या आकलना पलीकडे आहे हजारो बेरोजगार नोकरी मागत आहेत काम मागत आहेत असे असताना निवृत्त झाले त्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेणे म्हणजे हजारो बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बीड बेरोजगार यांनी प्राणांतिक उपोषण केले राजकीय नेते आणि मंत्र्यांनी हे उपोषण सोडायला लावले परंतु आता कंत्राटी पद्धतीने का होईना परंतु भरतीची वेळ आली तरीसुद्धा आणि डीएड बेरोजगारांनी शिक्षण मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये मोती तलावात समर्पण करण्याची सांगितले असताना सुद्धा अशा प्रकारे निंदनीय आहे तरी शासनाने सदर परिपत्रक रद्द करून रिक्त असणाऱ्या जागांवर कंत्राटी पद्धतीने का होईना कित्येक वर्ष बेरोजगार असलेल्या दीड बेरोजगारांना सामावून घेऊन त्यांना दिलासा द्यावा ही प्रमुख मागणी शिक्षक भारतीने निदर्शने करीत त्या परिपत्रकाची होळी केली. या आंदोलनात शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर ,कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर सी. डी.चव्हाण, केशव ढाकरे,समीर परब , सुभाष विणकर,माणिक पवार, नंदू पिळणकर, विलास राठोड, अनिकेत वेतुरेकर ,दिलीप गाडेकर ,नारायण कोठावळे, विश्वास धुरी, आनंद कदम, अमर राठोड ,मनीष तांबे आदी शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.