प्रतिनिधी/अक्कलकोट
नागुर ता.अक्कलकोट येथे लक्ष्मीपुत्र गुत्तेदार यांच्या शेतात ईलेक्ट्रीक तारेचा शॉक बसून तीन म्हैशीचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक लाख ६५ हजार रूपयाचे नूकसान झाले आहे. याची दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागूर येथील शेतकरी शिवानंद कोळी यांच्या रविवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जनावरे नागूर गावच्या शिवारालगत मौजे ईब्राहिमपूर गावच्या शिवारातील शेतकरी लक्ष्मीपुत्र यल्लय्या गुत्तेदार यांचे शेतात चारत असताना सदर शेतातील ईलेक्ट्रीक पोलवरच्या चार पदरी विजेच्या तारा अचानक जोरात वारा सुटल्याने त्या ऐकमेकांवर आदळून चार तारांपैकी एक ईलेक्ट्रीक तार तुटून चरत असलेले तीन म्हैशीवर पडल्याने शॉक बसून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबत शिवानंद कोळी (वय ४०) रा. नागूर यांनी दि