मालवण / प्रतिनिधी-
संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान ‘घर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जात आहे. या निमित्ताने रविवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता मालवण येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समस्त शहरवासीयांनी यात उत्साहात सहभाग घेतला.सकाळी ९:३० वाजता मालवण एस टी स्टँड येथून दुचाकी वरून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली.
तरी राष्ट्र प्रेमी नागरिक तिरंगा रॅली मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सर्वांचे विश्व हिंदू परिषद मालवणच्या वतीने आभार मानण्यात आले.