संजय खूळ, इचलकरंजी
आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी योग्य आखणी केली त्यांच्यावर लहानपणापासूनच सुसंस्कार केले आणि सोशल मीडिया ते टीव्ही पासून या मुलांना दूर ठेवले तर मुली आयुष्यात कशी चमकू शकतात याचे उत्तर उदाहरण इचलकरंजीतील व्यावसायिक उत्तम भाट यांनी दाखवून दिले आहे.शालेय जीवनापासून प्रत्येक परीक्षेत सहभागी होऊन चमकदार कामगिरी करतानाच प्रत्येक मुलीला संगीत आणि गायनात तरबेज करीत शिक्षणातील सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.आजच्या नव्या स्पर्धात्मक युगात भाट कुटुंबीयांची यशोगाथा अनेक पालकांना नक्कीच मार्गदर्शन करणारी आणि प्रेरणादायी आहे.
अध्यात्मिक गोष्टीचे भान,साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणीची बीजे मुलांमध्ये पेरताना सामाजिक भान या पुढील काळातही कसे ठेवावे याचा एक आदर्श त्यांनी आपल्या मुलांना घालून दिला आहे.मुलांच्या करिअरचे परफेक्ट कॅलेंडर तयार करून त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट कृतीत आणली आहे.आई-वडिलांचे परफेक्ट नियोजन कसं असू शकतं हेही त्यांनी समाजाला दाखवून दिले आहे.त्यांच्या या नियोजनामुळेच त्यांची एक कन्या ज्ञानेश्वरी ही वालचंद कॉलेजमध्ये बी टेक होऊन टाटा कन्सल्टन्सी या कंपनीत काम करीत आहे. दुसरी मुलगी वैष्णवी मुंबईच्या जीएस मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे तर तिसरी मुलगी गायत्री हिला यावर्षी आयआयटी मुंबई या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअर मध्ये प्रवेश मिळाला आहे.
उत्तम बाळकृष्ण भाट हे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला.घरामध्ये संगीत आणि अध्यात्माची जोड होती. त्यांचे वडील बाळकृष्ण दत्तोबा भाट हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक,माउथ ऑर्गन व बासरी वादक त्याचबरोबर उत्तम गायक होते.त्यांच्या आई अध्यात्मिक होत्या.आपल्या घराण्याचा हा वारसा आपल्या मुलांच्या पुढेही सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.शिक्षणाबरोबर विविध कलांमध्ये मुले पारंगत व्हावी हा त्यांचा ध्यास होता.शालेय जीवनापासून प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याबरोबरच वेगवेगळ्या कलात्मक स्पर्धेमध्येही त्यांची त्यांनी सर्व मुलांना सहभागी होऊ दिले.त्याचबरोबर विविध वाद्य आणि गायनाची जशी आवड असेल तसे शिक्षण त्यांनी देण्यास सुरुवात केले.ज्ञानेश्वरी, वैष्णवी आणि गायत्री या तिघींनीही स्कॉलरशिप पासून एमटीएस परीक्षेत अव्वल स्थान मिळवले. वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,गायन स्पर्धा अशा अनेक स्पर्धेत तिघांनीही बक्षिसे मिळवली.हे सर्व करत असताना त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.आई नंदा यांनी घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण ठेवताना प्रत्येक गोष्ट कशी वेळेवर होईल याकडे लक्ष दिले.घरामध्ये लायब्ररीही केली आहे. मुलांसाठी परफेक्ट वेळेचे नियोजन याच एका मोठ्या सूत्रावर त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना उच्च स्थानावर पोहोचवले आहे.
मुलांसाठी त्यांनी केल्या या गोष्टी
घरामध्ये टीव्ही घेतलाच नाही
मोबाईल कधीच हातात दिला नाही
सार्वजनिक कार्यक्रमात प्रोत्साहन दिले
आरोग्य व आहाराकडे विशेष लक्ष दिले
आवश्यक झोपेचे महत्त्व सांगितले
प्रत्येक परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन
सामाजिक भान जपण्याचा मंत्र
प्रत्येक मुलासाठी फ्युचर कार्ड
प्रत्येक जण संगीतात तरबेज
उत्तम भाट हे उत्कृष्ट गायक तसेच हार्मोनियम वादक आहेत ज्ञानेश्वरी ही तबलावादनाची चार परीक्षा दिली आहे तर वैष्णवी हार्मोनियम केशव आणि गिटार वाजवते गायत्री हिने गायनाच्या गंधर्व महाविद्यालयाच्या चार परीक्षा दिला आहेत तर मुलगा रुद्राक्ष हा दहावीला असून तबलावादनाच्या तीन परीक्षा दिला आहे या सर्वांना भागामध्ये असणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात आपली कला सादर करण्यास ते सांगत होते.
आयुष्याचे परफेक्ट कॅलेंडर
उत्तम भारतीयांनी आपल्याबरोबरच आपल्या मुलांच्या आयुष्याचे परफेक्ट कॅलेंडर बनवले आहे. 2014 मध्ये बनवलेल्या या कॅलेंडरमध्ये कोणती मुलगी कोणत्या वर्षी कोणत्या शाखेत व कोणत्या ठिकाणी प्रवेश घेणार याचाही प्लॅन त्यामध्ये होता आणि त्याप्रमाणेच तीनही मुलींनी परफेक्ट प्लॅन यशस्वी केला आहे. आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकांनी आपल्या कमाईतील पाच टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करायची अशी तरतूद ही त्यांनी सांगून ठेवले आहे. त्याचबरोबर गीता दासबोध आणि ज्ञानेश्वरी यामध्ये पीएचडी पूर्ण करण्याचा संकल्प त्यांच्या आयुष्यामध्ये ठेवला आहे.